शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

‘नथुराम’ जिवंत करण्याचे आश्वासन !

By admin | Published: February 22, 2016 2:33 AM

सध्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्याने वादामुळे बंद पडलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याची माझी तयारी आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी,ठाणे : सध्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्याने वादामुळे बंद पडलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याची माझी तयारी आहे. पण, निर्माते उदय धुरत यांच्यासोबत मी ते नाटक पुन्हा करणार नाही. नाटकाचे सर्व हक्क त्यांच्याकडे आहेत. त्यांनी ते सोडले, तर सध्याच्या काळात हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याची तयारी अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनी रविवारी दर्शवली. नाट्यसंमेलनात झालेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी नथुराम हा राष्ट्रवादी विचारांचा तरुण होता, असे सांगत हा दडपून टाकलेला इतिहास पुन्हा जिवंत करण्याची गरज व्यक्त केली. मी गांधी हत्येचे समर्थन करत नाही, पण सध्याच्या काळात देशभक्ती शिकवण्याची गरज आहे. या देशावर तुम्ही प्रेम केलेच पाहिजे, अशी सक्ती करायला हवी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे झाले, तसल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली येथे दंगा करता येणार नाही. मी तेथे असतो तर अफजलच्या नावाच्या घोषणा देणाऱ्यांना मारले असते. नुसती मुस्कटात नाही, तर त्यापुढेही जाऊन... अशी भूमिका त्यांनी घेतली.तुम्ही नथुरामचे विचार नाटकाद्वारे पोहोचविले. नथुरामने गांधीजींना नव्हे, तर जवाहरलाल नेहरूंना गोळ्या घालायला हव्या होत्या, असा संदर्भ देत एका प्रेक्षकाने यावर पोंक्षे यांना त्यांची भूमिका विचारली. ती स्पष्ट करताना गोडसेंच्या भावाशी न लिहिलेल्या किश्श्यांबाबत झालेल्या चर्चेचा हवाला देत ते म्हणाले, फाशीच्या काही दिवस आधी अंबालातील जेलरशी बुद्धिबळ खेळताना जेलरने त्यांना विचारले, ‘तुम्ही गांधींऐवजी नेहरूंना गोळ्या का नाही घातल्या.’ त्यावर गोडसे उत्तरले, ‘माझे अपुरे राहिलेले काम तुम्ही पूर्ण करा.’गांधीजींनी आत्महत्या केली नसती!सध्याच्या काळात महात्मा गांधी असते, तर देशाची ही स्थिती त्यांनाही आवडली नसती. पण, म्हणून त्यांनी साने गुरुजींसारखी गोळ्या खाऊन आत्महत्या केली नसती. कारण, त्यांचा हिंसेवर विश्वास नव्हता. उलट, ते शेवटपर्यंत जगले असते, असा अंदाजही पोंक्षे यांनी वर्तवला.रक्त न सांडलेले स्वातंत्र्यआपल्याकडे ‘बिना खड्ग बिना ढाल’ स्वातंत्र्य मिळाल्याचा अकारण डांगोरा पिटला जातो. तसे असते तर मग स्वातंत्र्यासाठी जे मरण पावले, ते कुठे गेले? त्यांचे रक्त सांडले नाही का? मग, हे स्वातंत्र्य ‘बिना खड्ग’ कसे असेल? ब्रिटिश काय बॅगा भरून तुम्ही मीठ उचलण्याची वाट पाहत बसले होते का, असा प्रश्न विचारत त्यांनी स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल प्रश्न उपस्थित केले. बौद्धिकाला कंटाळून शिवसेनेतचौथीपासून मी संघाच्या शाखेत जात होतो. तिथे दंड शिकवायचे. पण, मारायची वेळ आली की, बौद्धिके घ्यायचे. त्यामुळे कंटाळून मी शिवसेनेत आलो. कारण, या पक्षाच्या हिंदुत्वाची धार कमी झालेली नाही आणि व्हायची शक्यताही नाही. मी भाजपात गेलो नाही. कारण, हिंदुत्वाच्या भगव्याला हिरवी, निळी, पिवळी किनार देणे मला पटत नाही. अभिनेता जितेंद्र येईल!नथुराम, हिंदुत्व याबाबत प्रेक्षकांचे प्रश्न सुरू होताच पोंक्षे म्हणाले, फार प्रश्न विचारून संमेलनाचे स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणू नका. त्यांना त्यांचे काम करू द्या. नाहीतर, या विषयावर भूमिका मांडायला अभिनेते जितेंद्र येतील, असा टोला त्यांनी आव्हाड यांचे नाव न घेता लगावला. ...तर संरक्षण पुरवू : शिंदे ‘नथुराम गोडसे’ या नाटकाला शिवसेनेने आजवर वेळोवेळी संरक्षण पुरविले आहे. त्यामुळे यापुढील काळातही तशी वेळ आली तर आम्ही ते जरूर पुरवू, अशी भूमिका राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी जाहीररीत्या घेतली. हे नाटक पुन्हा सुरू करण्यासाठी वाटाघाटी करण्याची तयारी शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी दाखवली आणि त्यासाठी प्रसंगी मध्यस्थी करण्याचे जाहीर केले. त्यानंतर, शिंदे बोलत होते. वापसीसाठी पुरस्कार नाहीतमला किंवा माझ्या पत्नीला हा देश सोडून जावे, असे वाटत नसल्याचा टोला लगावून पोंक्षे म्हणाले, सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सुरक्षित वाटावे, असा हा देश आहे. मला पुरस्कारच मिळाले नाहीत, तर मी ते परत कसे करणार? अशी विचारणा करत त्यांनी पुरस्कार वापसीचा प्रश्न टोलवला.