शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

पुण्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर

By admin | Published: June 12, 2017 1:48 AM

आयआयटीमध्येच शिकायला जायचे हे ध्येय त्याने दहावीनंतरच निश्चित केले होते. कॉलेज, क्लास आणि दररोजचा ७ ते ८ तास अभ्यास याला एकही दिवस सुुटी दिली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आयआयटीमध्येच शिकायला जायचे हे ध्येय त्याने दहावीनंतरच निश्चित केले होते. कॉलेज, क्लास आणि दररोजचा ७ ते ८ तास अभ्यास याला एकही दिवस सुुटी दिली नाही. टीव्ही, चित्रपट, क्रिकेट मॅच यापासून तो ठरवून दूर राहिला, केवळ अभ्यासावरच त्याने लक्ष केंद्रित केले. रविवारी निकाल जाहीर झाला अन् अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स या परीक्षेमध्ये तो देशात दुसरा आणि राज्यात पहिला आला. अक्षतने पुण्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे. अखेर दोन वर्षांतल्या या खडतर मेहनतीचे फळ मिळाल्याची भावना अक्षत व त्याच्या परिवाराच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होती. ‘लोकमत’च्यावतीने संपादक विजय बाविस्कर यांनी अक्षतचा सत्कार केला. आयआयटीमधल्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेशपरीक्षेचे आयोजन केले जाते. अक्षतच्या यशाबद्दल भरभरून बोलताना त्याची आई रितू चुघ म्हणाल्या, ‘‘शाळेमध्ये अगदी केजीपासूनच अक्षत हा प्रत्येक परीक्षेला टॉप राहत आलेला आहे. आम्ही मूळचे पंजाबी; मात्र अक्षतच्या वडिलांच्या नोकरीनिमित्ताने जयपूरला जावे लागले. अक्षतचे सहावीपर्यंतचे शिक्षण जयपूरला झाले, त्यानंतर त्याच्या वडिलांची पुण्याला बदली झाली. सातवीला त्याने पुण्यातील दिल्ली पब्लिक स्कूलला प्रवेश घेतला. तिथेच त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अक्षतला अभ्यास कर, असे कधीही सांगावे लागले नाही. तो स्वत:हून अभ्यास करायचा. आम्ही त्याला कधीतरी बाहेर फिरायला जाऊयात असे म्हणालो, तरी तो यायचा नाही. मागील दोन वर्षे त्याने पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. बॉम्बे आयआयटीमध्ये कम्प्युटर सायन्स करायचे हे त्याने ठरविलेले होते. आजच्या निकालामुळे त्याची ती इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे.’’अक्षतचे वडील टाटा स्काय कंपनीचे उपाध्यक्ष आहेत, तर आई गृहिणी आहे.