शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
2
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
3
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
4
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
5
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
6
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
7
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
8
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
9
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
10
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
11
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
12
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
13
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
14
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
15
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
16
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
17
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
18
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
19
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
20
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

‘राष्ट्रवादी’ संतांची टोळी नव्हे!

By admin | Published: June 27, 2014 12:17 AM

आरक्षणाचा निवडणुकीत फायदा होईलही, ताकाला जाताना भांडं लपवायची आमची पद्धत नाही. शेवटी राष्ट्रवादी म्हणजे काय संतांची टोळी नाही!’ असे विधान शरद पवार यांनी केले.

कराड (जि़ सातारा) : ‘मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण दिले म्हणून विरोधकांनी टीका करण्याची गरज नाही. मागणी होती म्हणून दिले आहे. निवडणुकीत त्याचा फायदा होईलही, ताकाला जाताना भांडं लपवायची आमची पद्धत नाही. शेवटी राष्ट्रवादी म्हणजे काय संतांची टोळी नाही!’ असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी येथे केले. 
यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगावी देवराष्ट्रे येथील कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पवारांनी कराड येथे पत्रकारांशी संवाद साधला.
मराठा आणि मुस्लीम समाजाला निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आरक्षण दिल्याचा आरोप होत आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता पवारांनी वरील विधान  केले. आरक्षणाच्या निर्णयाचा निवडणुकीत फायदा होईल, असे सूचक विधान करून त्यांनी जणू निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणोशाच केला. पुणो पदवीधर मतदारसंघातील पराभवाबद्दल पवार म्हणाले, ‘आमच्यातील बंडखोरीमुळे हा पराभव झाला आहे. आपण बंडखोरांचे ‘लाड’ पुरवणा:यांवर काय कारवाई करणार का, यावर ‘मी तुम्हाला का सांगू,’ असा प्रतिप्रश्न केला. विधानसभा निवडणुकीत अशी बंडाळी होणार काय, असे विचारल्यावर ‘ज्या-त्या वेळी बघू,’ असे उत्तर दिले. 
मोदी सरकारच्या एक महिन्याच्या कारभाराबाबत बोलताना ते म्हणाले की, इतक्यात प्रतिक्रिया देणो घाईचे ठरेल. त्यांना काम करायला संधी तर द्यायला पाहिजे, पण ते आपल्या निर्णयावर ठाम न राहता धरसोड करतात, असेच सध्या म्हणावे लागेल. 
‘लिंगायत’ आरक्षणासाठी केंद्राकडे प्रस्ताव : ‘मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला; मग लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे काय?’ या मागणीकडे लक्ष वेधले असता त्यांच्या आरक्षणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे पवारांनी सांगितले. (वार्ताहर)
 
मुख्यमंत्री बदलाची मागणी नाही 
मुख्यमंत्री कोण असावं, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना बदलावे, अशी मागणी करण्याचा आमचा प्रश्नच नाही. पण, उलट काँग्रेसमधीलच नेते यासंदर्भात आपल्याला भेटले,’ अशी गुगलीही टाकली. ‘मुख्यमंत्र्यांच्या कामावर समाधानी आहात काय,’ या प्रश्नाचं उत्तर देणंही खुबीनं टाळलं.
 
सोशल मीडियाकडे दुर्लक्ष केल्याची किंमत मोजतोय
सोशल मीडिया संवाद साधण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. आम्ही याकडे दुर्लक्ष केले त्याची किंमत आम्ही आज मोजत आहोत. यापुढे तुम्ही या माध्यमाकडे दुर्लक्ष करू नका,’ असे आवाहन शरद पवार यांनी केले. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील तरुण कार्यकत्र्यासाठी आयोजित ‘सोशल मीडिया’वरील कार्यशाळेत ते बोलत होते.
 
‘उदयन’राजेंची भूमिका आमचीच!
‘मुख्यमंत्री बदलासाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे, असं म्हणतात; पण राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तर पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले आहे,’ असे सांगताच ‘तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. उदयनराजेंची भूमिका तीच राष्ट्रवादीची भूमिका,’ असा खुलासाही पवारांनी केला.