शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

निसर्ग चक्रीवादळाचा जि. प. शाळांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 06:12 IST

संडे अँकर । ठाण्यासह कोकणातील सर्वाधिक समावेश : पुणे-नाशिकच्या शाळांचेही नुकसान

नारायण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने राज्यातील १५४० प्राथमिक शाळांना तडाखा बसला असून, त्यांची प्रचंड हानी झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील ३२ शाळांसह रायगड जिल्ह्यातील ९३८, तर रत्नागिरीतील २८९ आणि पुण्यातील २५४ शाळांचा समावेश आहे.यात किनारपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सर्वांत कमी म्हणजे आठ, तर नाशिक जिल्ह्यातील १९ शाळांचीही मोठी पडझड झाली आहे. यामुळे चक्रीवादळग्रस्त विभागास मदत पथकांनी भेट देण्याअगोदर महसूल व वनविभागाने या शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने ९ सप्टेंबर २०२० रोजी पाच कोटी ५३ लाख ११ हजारांची मदत वितरित केली.३ जून रोजी हे निसर्ग चक्रीवादळ धडकण्याआधीच ५० ते ६० किमी अंतरावरून त्याची दिशा बदलल्याने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात त्याचा फारसा तडाखा बसला नसला तरी रायगड आणि रत्नागिरीत अपरिमित हानी झाली.यात मच्छीमारांसह शेती, फळबागा, वृक्षवेली आणि महावितरणच्या वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांच्यापडझडीसह जनावरेही दगावली होती. यात त्या त्या जिल्ह्यातील जि.प.च्या शाळांचेही अतोनात नुकसान झाले. त्यामुळे या सुमारे १५४० शाळांच्या दुरुस्तीसाठी तब्बल तीन महिन्यांनंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १० कोटींची मदत केली होती. परंतु, ती तोकडी असल्याने महसूल विभागाने गेल्या आठवड्यात मदत दिली.माध्यमिक शाळांच्या दुरुस्तीला मदत नाहीप्रति शाळा दोन लाखांची ही मदत असून, ती फक्त प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठीच आहे. त्यामधून माध्यमिक शाळांसह अशासकीय शाळांची दुरुस्ती करू नये, असे शासनाने बजावले आहे. परंतु, निसर्ग चक्रीवादळाने प्राथमिक आणि माध्यमिक किंवा अशासकीय असा भेदभाव न करता सर्वच शाळांना तडाखा दिला. यामुळे त्यांचे नुकसान कोण भरून काढणार, असा प्रश्न करण्यात येत आहे. शासनाने किमान जि.प.च्या माध्यमिक शाळांच्या दुुरुस्तीसाठी तरी निधी द्यावा, अशी मागणी होत आहे.वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व शाळांच्या दुरुस्तीसाठी निधीचे प्रस्ताव पाठविले होते. त्यातून प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचा निधी प्राप्त झाला आहे. यात आणखी काही शाळांसाठी निधी येणार की काय? याबाबत चौकशी करावी लागेल. तसेचमाध्यमिक शाळा या संस्थांच्या असल्यामुळे त्यांच्या पातळीवर ते दुरुस्तीचे काम करून घेतात. आम्ही सर्वांनाच प्रस्ताव द्यायला सांगितले होते.- शेषराव बढे, शिक्षणाधिकारी, जि.प.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळSchoolशाळा