शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

भाजपवरील खोट्या आरोपांबाद्दल नवाब मलिक यांनी जनतेची माफी मागावी; प्रसाद लाड यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 19:35 IST

भाजपकडून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा राज्य सरकारमार्फतच केला जाणार होता : प्रसाद लाड

ठळक मुद्देभाजपकडून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा राज्य सरकारमार्फतच केला जाणार होता : प्रसाद लाडरेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्यानं जनतेला त्रास, लाड यांचं वक्तव्य

"दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीतील 'रेमडेसिवीर'चा साठा भारतीय जनता पार्टीचे नेते राज्य सरकारच्याच ताब्यात देणार होते असा खुलासा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केल्याने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा खोटेपणा उघड झाला आहे. या खोटेपणाबद्दल मलिक यांनी महाराष्ट्राची माफी मागावी आणि राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार यांनी खोटे आरोप करणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी केली. रेमडेसिवीर औषधांच्या साठेबाजीची सीबीआयकडून चौकशी करा, अशी मागणीही लाड यांनी यावेळी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   "भाजपकडून जो ५० हजार रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा राज्य सरकारच्या मार्फतच केला जाणार होता असे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री शिंगणे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. नवाब मलिक यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकार व भाजपाच्या नेत्यांविरूद्ध जे आरोप केले, ज्या अफवा पसरवल्या त्याबद्दल त्यांनी माफी मागावी," असं लाड यावेळी म्हणाले.

अशोक चव्हाणांच्या मागणीला पाठिंबा  राज्यामध्ये रेमडेसिवीर औषधांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाला आहे. राज्य सरकारला हा काळाबाजार रोखता आला नसल्याने  जनतेची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे या औषधाच्या साठेबाजीची  व काळ्याबाजारातील विक्रीची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचंही लाड यांनी नमूद केलं. "राज्य सरकारच्या विविध यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा स्तरावरील यंत्रणांना रेमडिसीवरचा काळाबाजार रोखता आलेला नाही. आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी  एनआयए अथवा सीबीआय मार्फत  या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांच्या या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे. अशी चौकशी झाल्यास या प्रकरणातले सत्य बाहेर येईल," असं त्यांनी नमूद केलं.भाजप राज्य सरकारमार्फतच मदत करणार"भारतीय जनता पक्षानं  संकटाच्या काळात नेहमी जनतेच्या कल्याणाचा विचार केला. भाजपाकडून औषधांची जी मदत केली जाणार आहे ती राज्य सरकारच्या मार्फतच केली जाणार आहे. परस्पर नाही.  राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवार चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या औषधांचा पुरवठा केला. स्थानिक पातळीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींकडून परस्पर औषधांचा पुरवठा केला आहे. मग हा औषधांचा साठा कुठून आला? या लोकप्रतिनिधींना औषधे पुरवण्याची परवानगी कोणी दिली?," असा सवालही लाड यांनी केला.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPrasad Ladप्रसाद लाडnawab malikनवाब मलिकBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीSharad Pawarशरद पवार