शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

नक्षलींची भीती झुगारून ते आले सैन्यभरतीला..!

By admin | Published: January 10, 2017 7:55 PM

‘‘आम्ही सैन्यभरतीसाठी आलो, आता इकडेच सेटल झालो तर ठिक होईल. गावाकडे गेलो तर जगू-वाचू गॅरंटी नाही...’’ सैन्यभरतीकरिता गडचिरोलीतून आलेल्या तरुणांचा

- अविनाश साबापुरे/ ऑनलाइन लोकमत
 
यवतमाळ, दि. 10 - ‘‘आम्ही सैन्यभरतीसाठी आलो, आता इकडेच सेटल झालो तर ठिक होईल. गावाकडे गेलो तर जगू-वाचू गॅरंटी नाही...’’ सैन्यभरतीकरिता गडचिरोलीतून आलेल्या तरुणांचा हा स्वर आहे. भारत सरकारचा कायम विरोध करीत जेथे नक्षल्यांचे समांतर सरकार प्रबळ आहे, त्याच गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांनी भारताच्या रक्षणासाठी सैनिक होण्याचा निर्धार केला आहे. नक्षल्यांची जरब झुगारून आलेल्या या तरुणांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना देश आणि समाजाबद्दल उत्कट प्रेम व्यक्त केले. 
यवतमाळात सुरू असलेल्या विदर्भस्तरीय सैन्यभरतीत वैभव वासेकर, आकाश वासेकर, गणेश कुनघाडकर हे तरुण शारीरिक चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले. आता त्यांना लेखी परीक्षेसाठी पुण्याला जावे लागणार आहे. तत्पूर्वी गावाकडे (कुनघाडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) जायचे आहे. पण यापूर्वीचे काही अनुभव पाहता ते क्षणभर विचारात पडले... ते म्हणाले, गेलो तर काय होईल सांगता येत नाही. आमचे गाव सध्या तरी धोक्यापासून दूर आहे. पण कमळापूर, भामरागड असे घनदाट जंगलांचे परिसर नक्षल्यांनी पूर्णपणे व्यापलेले आहे. तेथील तरुणांना तर सैन्यभरतीची माहितीही नसावी, इतके ते दुर्लक्षित आहे. त्यामुळेच सैन्यभरतीत गडचिरोलीतून सर्वात कमी मुलं येतात. आमच्या जिल्ह्यातले जे लोक अशा भरतीसाठी येतात, ते परत गावाकडे येत नाही. आले तर वाचत नाही. एकदा इन्टीमेशन दिली जाते. ऐकले नाही तर सरळ शूट केले जाते...! 
सर्वसामान्यांसारखेच दिसणारे नक्षली कधी घात करतील, याचा नेम नसल्याने गडचिरोलीतील तरुण ‘नॉर्मल’ जगणे जाणीवपूर्वक टाळतात. एखादी व्यक्ती चारचौघांपेक्षा वेगळी दिसली रे दिसली, की लगेच नक्षल्यांच्या निशाण्यावर येते. त्यामुळेच कारवाफा (ता. धानोरा) येथून आलेला हर्षद बावणे हा तरुण ‘नाव छापू नका’ अशी अट घालूनच बोलायला तयार झाला. अवघ्या दीड एकर शेतीत आईवडील, दोन बेरोजगार भाऊ राबतात. हर्षदही बारावी शिकून शेतीतच राबतो. त्यामुळे जिवाची भीती असली तरी तो सैन्यभरतीकरिता जिल्ह्याच्या बाहेर पडला. 
गडचिरोलीसह भंडारा-गोंदियाच्या ब-याचशा भागात नक्षली कारवायांचे गडद सावट आहे. मात्र, या भीतीसोबतच गरिबी आणि बेरोजगारी हे दोन मोठे शत्रू ठरत आहे. अभावग्रस्त जगण्यातूनच देशासाठी जगण्या-मरण्याची आण घेण्यापर्यंत येथील तरुणांची मजल गेली आहे. पवनीचा (जि. भंडारा) सोनू कोरे शेतमजुरी करत बी.कॉम. फायनलपर्यंत शिकत आला. ‘इतरत्र नोकरी शोधायची तर डोनेशन देऊन गुलामी करावीच लागणार आहे. मग देशाच्या सीमेवर नोकरी करीत मेलो तर काय हरकत आहे?’ हा प्रश्न स्वत:ला विचारत तो सैन्यभरतीत सामील झाला. महिनाभर धान मळणीयंत्रावर मजुरी करून त्याने ५ हजार कमावले अन् तेच घेऊन तो भरतीसाठी यवतमाळात आला. आईवडील वृद्ध असूनही मजुरी करतात ही सल त्याच्या मनात असली तरी समाजासाठी आपले कर्तव्य ओळखून त्याने दोनवेळा रक्तदानही केले. गोंदियाच्या एमआयटी कॉलेजमध्ये बीई करीत असलेला पियूष बनसोडही सैनिक होण्यासाठी आलाय. येथे ‘डोनेशन’ द्यावे लागत नाही, हेच त्याच्या येण्याचे एकमेव कारण. त्याचेच मित्र विवेक सडमथे, साजीद पठाण, सतीश मस्के, अक्षय चौधरी, महेंद्र कारेमोरे, क्षितीज तागडे हे तरुणही याच कारणाने आले आहेत. 
 
पहले देश, बाद मे पेट : शादाब पठाण 
‘आजकल कुछ लोग मुसलमान बोले तो पाकिस्तान का आदमी मानते हैं. लेकीन मेरे को पाकिस्तान से कोई लेना देना नही. जो हम को पाल रहा हैं वो भारतही मेरा सबकुछ हैं.’ हे वाक्य आहे सैन्यभरतीसाठी आलेल्या गोंदियाच्या शादाब पठाणचे. बीए करता-करता तू सैन्यभरतीसाठी का आला, या प्रश्नावर शादाब म्हणाला, ‘देश को अपुन सबकुछ मानता हूं. पिताजीका चिकन सेंटर हैं. वो धंदे मे भी पेट भर सकता हैं. लेकीन मेरलिए पहले देश हैं, उसके बाद मे पेट.’ काटोलच्या ‘टँगो चार्ली करिअर अकॅडमी’च्या ग्रूपने यवतमाळातील सैन्यभरतीत मोफत जेवणाची सोय केली आहे. त्यांच्याच सोबत राहून शादाबही इतर तरुणांना जेवण वाढून देत आहे.