शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 12:52 IST

NCP Ajit Pawar Group Vs Thackeray Group: तेव्हा मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे, याबाबत चर्चा झाली. शरद पवार यांच्याकडे पर्याय नव्हता म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले, असा दावा करण्यात आला आहे.

NCP Ajit Pawar Group Vs Thackeray Group: अजित पवारांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजित पवारांनी तो निर्णय परस्पर घेतला होता, असे सांगितले गेले. परंतु वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती अजित पवारांनी कुणाला न विचारता असा निर्णय घेतला असता तर पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केले असते का? असा सवाल करतानाच यामध्ये अजित पवारांची काहीही चूक नाही, हे ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करा असे ठरले त्यामुळेच वरिष्ठांना अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.

मीडियाशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, अजित पवार यांना पक्षात माफी मागायला लावून परत घेतले, हे जे सांगितले जाते ती वस्तुस्थिती नव्हती तर सर्व आमदारांचे समर्थन अजित पवारांना होते. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे, असे उमेश पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांनी एका मुलाखतीत अजित पवारांवर जे मुद्दे मांडले, ते सर्व खोडून काढले. 

वरिष्ठांनी पक्षात यु टर्न घेतल्यामुळेच अंतर्गत कलह वाढला

उमेश पाटील यांनी पुढे सांगितले की, २००४ पासून २०१९ पर्यंत सातत्याने वरिष्ठांनी पक्षात यु टर्न घेतल्यामुळेच अंतर्गत कलह वाढला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. कधी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तर कधी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला. या पुत्र आणि मुलीच्या प्रेमातून दोन्ही पक्षात फूट पडलेली दिसत आहे. हीच कारणे त्यामागे दडलेली आहेत, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संजय राऊत खोटे बोलतात. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता. २०१९ मध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे ठरले. मात्र, रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव सुरुवातीला मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. ते शक्य नसल्याचे लक्षात येताच संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायच होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांना करणार होते. रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांना करावे असे ठरले. परंतु शरद पवार यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे मुख्यमंत्री राहतील, याबाबत चर्चा झाली. भाजपासोबत आमची जी डील झाली होती. ती फिरवण्यात आली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. अजित पवार यांना क्षमा करून उपमुख्यमंत्री केले असा दावा केला जातो. परंतु, शरद पवार यांना पर्याय नव्हता म्हणून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावे लागले, असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार