शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

ईव्हीएममध्ये नव्हे, तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 16:15 IST

शरद पवारांनी व्यक्त केला संशय

मुंबई: ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये अडचण नसून निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड होत असल्याचा संशय पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या 20 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या घोटाळ्याच्या खोलात जाणार असल्याचं शरद पवार म्हणाले. 'मतदार ज्या ठिकाणी मतदान करतात, त्या ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काहीच घोटाळा नाही. पण ज्यावेळी ईव्हीएम निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाती जाते. त्यांच्याकडून मतमोजणी केली जाते, त्यावेळी काहीतरी गडबड होते. आम्ही काही तंत्रज्ञांशी आणि विरोधकांशी चर्चा करून या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत,' असं शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. मतदान आणि मतमोजणीतील घोटाळा लोकांच्या लक्षात आल्यास लोक कायदा हातात घेतील, अशी भीती पवारांनी व्यक्त केली. 'आपण दिलेलं मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला जात नसल्याचं लोकांच्या लक्षात आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल. लोक आता शांत राहतील. पण भविष्यात असं घडल्यास माणसं कायदा हातात घेतील आणि आम्ही ते होऊ देणार नाही,' असं शरद पवार यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पवारांनी ईव्हीएमवर भाष्य करताना बारामतीचा उल्लेख केला होता. बारामतीत भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं म्हणत शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला होता. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVVPATव्हीव्हीपीएटीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९