शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

राष्ट्रवादीतील संवाद, विश्वास संपला - बबनराव पाचपुते

By admin | Published: August 14, 2014 1:25 AM

राष्ट्रवादीतील विश्वास आणि संवाद संपला आहे. पक्ष संघटनाच यामुळे अडचणीत आली आहे, अशी खेदयुक्त प्रतिक्रिया माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी केले आहे

अहमदनगर : राष्ट्रवादीतील विश्वास आणि संवाद संपला आहे. पक्ष संघटनाच यामुळे अडचणीत आली आहे, अशी खेदयुक्त प्रतिक्रिया नोंदवत पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. दरम्यान, १८ रोजी भाजपा प्रवेशाच्या वृत्ताचा इन्कार करतानाच समर्थक कार्यकर्त्यांनी निर्णय दिला तर राष्ट्रवादीत राहून घरी बसू, असेही ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. आज उशिरा सायंकाळी पाचपुते यांचा भाजपा प्रवेश १८ रोजी होईल, अशी वार्ता पसरली. याबाबत संपर्क केला असता आ.पाचपुते यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना या वृत्ताचा इन्कार केला आहे. मात्र पक्षात आपण एकटे पडलो आहोत, ही भावना त्यांना लपवता आली नाही. ते म्हणाले, आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटलो. आमचे नेते अजित पवार यांच्याकडे गेलो. पण त्यांनी समजूनच घेतले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले, या तक्रारी असतील तर त्याचा खुलासा करण्याची संधी मिळाली पाहिजे होती. मात्र पक्षात ऐकूनच घेतले जात नाही. याप्रकारे संवाद आणि विश्वास संपला तर पक्ष संघटना पुढे कशी वाढणार, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, आपण बोलतोय हे सर्वांच्याच मनात आहे. पण बोलण्याची हिंमत होत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शरद पवार आमचे नेते होते, आजही आहेत, असेही ते म्हणाले. मनातील खंंत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मांडली होती, असा नवा खुलासाही आ.पाचपुते यांनी आज केला. मात्र त्यानंतरही पक्षाकडून दखल घेण्यात आलेली नाही, याची कबुलीही त्यांनी दिली. यामुळेच समर्थक कार्यकर्त्यांकडून पक्ष सोडण्याचा दबाव वाढला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, भाजपाकडून संपर्क झाल्याचा दुजोरा त्यांनी दिला. मात्र पक्षप्रवेशाचा निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगीतले. १५ आॅगस्ट रोजी श्रीगोंद्यात समर्थकांचा मेळावा होईल. या मेळाव्यात होणारा निर्णय आपल्याला मान्य राहील. पक्षातच राहण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी दिला, तरी त्याचा आदर राखत आपण घरी बसू, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)