शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

Maharashtra Politics: “...तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे”; अजित पवारांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 9:13 AM

Maharashtra News: जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा आम्ही विरोध केला होता, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: अलीकडेच राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये भाजप आणि शिंदे गट तसेच महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. शिंदे गटानेही करून दाखवत ठाकरे गटाला मागे टाकले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्रमक भूमिका मांडत, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला गेला पाहिजे, अशी मागणी केली. 

अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा प्रस्ताव जेव्हा विधिमंडळात मांडला, त्याला आम्ही विरोध केला होता. सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार असेल तर नगराध्यक्ष, महापौर, मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानही जनतेमधून निवडण्यात यावा, अशी आमची भूमिका होती. जनतेमधून सरपंचाची थेट निवड झाल्याने बऱ्याच वेळा गोंधळ निर्माण होतो. सरपंच आणि सदस्य वेगवेगळ्या विचारांचे असतील तर मग बघायलाच नको. यामध्ये गाव मात्र निष्कारण भरडले जाते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. 

आपल्या मुलांनी कामे कुठे मागायची?

दुसरीकडे, राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचे काहीही नुकसान होणार नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणे, हे अतिशय चुकीचे आहे. यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढते. उद्योग बाहेर गेले, तर आपल्या मुलांनी कामे कुठे मागायची. लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्याने रोजगार बुडाला आहे, या शब्दांत अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, एकीकडे राज्यातून मोठे प्रकल्प गेले आणि दुसरीकडे राजकीय व्यक्तीकडून अशाप्रकारचे समर्थन होते असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन राज्यात रोजगार निर्माण होतील, असे अजित पवार यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर