शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिल्लीतील नेत्यांच्या नाराजीमुळे फडणवीसांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात : मिटकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 13:59 IST

तर भाजपचे नेते अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाही. त्यामुळे सरकारवर टीका करण्यापलीकडे त्यांना काहीच सुचत नसल्याचेही मिटकरी म्हणाले.

मुंबई : विरोधी पक्षाकडून महाविकास आघडीच्या सरकारवर सतत होत असलेल्या आरोपावरून राष्टवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीतील भाजपचे नेते फडणवीस यांच्यावर नाराज असल्याने त्यांचे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता असल्याचं मिटकरी म्हणाले आहे.

मिटकरी म्हणाले की, महाविकास आघाडी अजून  पुढील 25 वर्षे सत्तेत राहणार असून, फडणवीस यांनी काळजी करू नयेत. तर विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता गेली. त्यांनतर झालेल्या जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपला विरोधात बसावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीतील नेते फडणवीस यांच्यावर नाराज असून, त्यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात असल्याचे मिटकरी म्हणाले.

महाविकास आघाडीतील सर्वच मंत्र्यांची कामे चांगली सुरु आहे. तर भाजपचे नेते अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाही. त्यामुळे सरकारवर टीका करण्यापलीकडे त्यांना काहीच सुचत नसल्याचेही मिटकरी म्हणाले. तसेच राज्यात पुढेही आता महाविकास आघाडीचचं सरकार कायम राहणार असल्याचे मिटकरी म्हणाले.