शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस; BCCI देणार 125 कोटी रुपये, जय शाहंची घोषणा...
2
"हा बालिशपणा..."; विधानसभेची मॅच जिंकू म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला
3
लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु
4
उद्योग गुजरातला पळविले आणि ड्रग्ज महाराष्ट्रात येताहेत; आदित्य ठाकरेंची टिका
5
माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष
6
वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये; भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान
7
Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन
8
रोहित-विराटच्या वाटेवर...'सर' रवींद्र जडेजाने T-20 क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
9
IND vs SA: रोहित शर्मानं का खाल्लं मैदानावरचं गवत? झाला खुलासा! 13 वर्षांपूर्वी 'या' दिग्गज खेळाडूनंही असंच केलं होतं
10
५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणासाठी संविधानात बदल करावा लागेल; काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा
11
राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी; सुजाता सौनिक यांची नियुक्ती, आणखी एक विक्रम...
12
मुकेश अंबानींपेक्षाही मोठं घर, ₹20000 कोटींची संपत्ती; या माजी क्रिकेटरचा 'थाट' अन् 'रईसी'समोर धोनी-कोहलीही फेल!
13
भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा
14
केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन; भाविकांच्या हृदयाचा ठोका चुकला, पाहा Video...
15
हा कुठला जज, पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय 300 शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य; राज ठाकरेंची अमेरिकेतून टीका
16
जगज्जेत्या संघावर बीसीसीआय खजिना रिता करणार? 2011 ला दुपटीने वाढवलेली रक्कम, यंदा किती देणार
17
TISS मधून १५५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; समोर आलं धक्कादायक कारण
18
शरद पवार पायी वारीत चालणार?; चर्चांवर स्वत:च केला खुलासा, म्हणाले...
19
विराटची निवृत्तीची घोषणा झाकोळली जाऊ नये; रोहितने मैदानावर निवृत्ती का टाळली?
20
'जे लोक मला एक टक्काही...', हार्दिक पंड्याने विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या

...तर मी अजित पवारांचा धिक्कार करतो! बिर्ला देशद्रोही...! हे काय बोलून गेले आव्हाड? वाद पेटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 3:05 PM

आव्हाड विधानभवनाबाहेर बोलत होते. त्यांच्या या विधानावरून आत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही...

सध्या राज्याचे पावसाळी अधिवेश सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतील श्लोकांच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि संविधानाच्या मुद्द्यावरून लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासंदर्भात भाष्य केले आहे. "मनुस्मृतीतील चार श्लोक विचाराधीन होते, असे अजित पवार म्हणत असतील, तर मी त्यांचा धिक्कार करतो." तसेच, "संविधानाचे नाव घेऊ नका, असे म्हणणारा, या देशाचा देशद्रोही आहे... बिर्ला देशद्रोही आहेत!" असे आव्हाड यांनी म्हटले आहे. ते विधानभवनाबाहेर बोलत होते. त्यांच्या या विधानावरून आत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार म्हणाले असतील तर -यावेळी, मनुस्मृतीसंदर्भात अजित पवारांनी म्हटले आहे की, मनुस्मृतीतील चार श्लोक आम्ही घेतले नाही. विचाराधीन असताना सातत्याने टीका केली जात आहे? असे विचारले असता आव्हाड म्हणाले, विचाराधीन... कोण म्हणालं हे? अजित पवार म्हणाले असतील तर मी त्यांचा धिक्कार करतो. तुम्ही मनुस्मृतीचा विचार तरी कसा करू शकता? दुर्दैव आहे. आता नाही म्हणताहेत, कारण हे महाराष्ट्रभर गेले आहे. तुम्ही संविधान बदलणार होतात, नंतर तुम्हाला भूमिका बदलावी लागली. कारण संपूर्ण देशभरातून विरोध व्हायरला लागला. आता मनुस्मृती संदर्भात स्वतः अजित पवार म्हणणार असतील की, विचाराधीन होतं, तर मी अजित पवारांचाच धिक्कार करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

बिरला देशद्रोही - आव्हाड :संसदेच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर, जय संविधान, अशी घोषणा दिली होती. यानंतर थरूर सभापती ओम बिर्ला यांच्यासोबत हस्तांदोलन करून आपल्या जागेवर परतत होते. तेवढ्यात सभापतींनी त्यांना हटकले आणि म्हणाले, संविधानाची शपथ तर घेतच आहात, ही संविधानाचीच शपथ आहे. यासंदर्भात विचारले असतता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते जितेंद्र आव्हा म्हणाले, "हेच बघा, त्यांना संविधानाबद्दल किती राग आहे? ते पार्लमेंट चालतं संविधानानुसार, ते जे पद आहे, ते संविधानातून निर्माण झाले आहे आणि संविधानाचे नाव घेऊ नका असे म्हणणारा, या देशाचा देशद्रोही आहे... बिर्ला देशद्रोही आहेत! असे आव्हाड म्हणाले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAjit Pawarअजित पवारom birlaओम बिर्लाNCPराष्ट्रवादी काँग्रेस