शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा”; प्रफुल्ल पटेलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 15:07 IST

Praful Patel: महायुतीमध्ये चांगला समन्वय आहे. उगाच कुणी वादावादीचा लावायचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे, त्यात तथ्य नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

Praful Patel: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर सत्तेत सहभागी झालेला अजित पवार गट यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा बैठका अजित पवार घेत असल्याचे समोर आले होते. यावरूनही शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जात होते. तसेच अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असे दावेही केले जात आहेत. मात्र, यातच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

येत्या १५ ते २० दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतात ते जनता बघेल. यात मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होणार आहे. पुढचा सप्टेंबर हा महिना या राज्यातल्या सत्ताबदलाचा असेल. माझ्या सूत्रांनी मला माहिती दिली आहे. राज्यातील सत्तेत बदल होईल. एकूणच ज्या पद्धतीने हे सरकार चालले आहे त्यावरून सर्वगोष्टी स्पष्ट आहेत. ज्यांना मुख्यमंत्री केले आहे, त्यांना काम करु दिले जात नाही आणि जे मुख्यमंत्री होणार होते ते अर्धे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या अर्ध्यातला अर्धा हिस्सा काढून घेतला. त्यामुळे १०५ आमदार असूनही सत्तेतला पाव हिस्सा मिळणार असेल तर ही मंडळी काय स्वस्थ बसणारी आहे का? माझ्या सूत्रांनी १०० टक्के सांगितले आहे की राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात सुरू आहेत, असा मोठा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर प्रफुल्ल पटेल यांनी खोचक शब्दांत टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. वडेट्टीवार यांची प्रगती झाली आहे. सप्टेंबरमध्ये सरकार पडणार आहे असे ते म्हणत असतील तर त्यावर मला पाणी फेरायचे नाही, सगळ्यांना शुभेच्छा, असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेचा प्रफुल्ल पटेल यांनी समाचार घेतला.

दरम्यान, अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक विभागाची माहिती घेण्याचा, बैठक घेण्याचा आणि योग्य रीतीने निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यात काहीही चूक नाही. आमच्या महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्षात चांगला समन्वय आहे. प्रत्येक गोष्टीत एकमेकांशी संवाद साधून आम्ही निर्णय घेत असतो. यात कोणी उगाच वादावादी लावायचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे, त्यात तथ्य नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलprafull patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस