शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

बाबा सिद्दीकींचा काँग्रेसला रामराम; NCP अजितदादा गटाची प्रतिक्रिया, “ही तर सुरुवात...”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 1:19 PM

NCP Sunil Tatkare Reaction on Baba Siddique Resigns Congress: आगामी काळात असेच काही धक्के पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आले आहे.

NCP Sunil Tatkare Reaction on Baba Siddique Resigns Congress: केंद्रीय स्तरावर इंडिया आघाडी आणि राज्य स्तरावरील महाविकास आघाडी यांच्यातील अस्वस्थता आणि बिघाडी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. या घटनेला काही दिवस लोटले असतानाच मुंबईतील काँग्रेसचे दुसरे बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. 

एक्सवर एक पोस्ट शेअर करत बाबा सिद्दीकी यांनी आपला निर्णय जाहीर केला. मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आता ४८ वर्षांनी पक्ष सोडत आहे. माझा हा प्रवास खूप छान होता. माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम देत आहे. आणखी अनेक गोष्टी आहेत ज्या आत्ताच सांगणे योग्य होणार नाही. काही गोष्टी या न सांगितलेल्याच बऱ्या असतात. माझ्या या प्रवासात ज्या-ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे, असे सांगत बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य करत काँग्रेसवर टीका केली आहे. 

आगामी काळात असेच काही धक्के पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको

बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा म्हणजे काँग्रेसमधील प्रचंड अस्वस्थता आणि खदखद यांचे द्योतक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाबा सिद्दीकी यांनी मुंबई आणि परिसरात आपले वर्चस्व स्थापन केले आहे. काँग्रेस विचाराची माणसे पक्षापासून का दूर जात आहेत, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावर नक्कीच येणार आहे. ही तर सुरुवात आहे. आगामी काळात असेच काही धक्के पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटायला नको, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ही एक बोलण्याची पद्धत आहे. बाबा सिद्दिकी राज्याच्या मंत्रिमंडळात दीर्घ काळ होते. त्यांचे चिरंजिव त्या मतदारसंघातून निवडून आले आहेत. अशी विधाने करून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. अपयश झाकण्याचा माणसे प्रयत्न करतात, तेव्हा ते सत्य परिस्थितीपासून दूर जातात, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेPoliticsराजकारण