शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

Maharashtra Political Crisis: “धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 1:16 PM

Maharashtra Political Crisis: सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही. आ देखे जरा किसमें कितना है दम, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अपत्यांचे नाव टीईटी घोटाळ्यात येणे, अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असतानाच भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या एका ट्विटने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी, लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असा इशारा कंबोज यांनी ट्विटमधून दिला. तसेच २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याची बंद कलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली असून, मोहित कंबोज आणि भाजपविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. 

आ देखे जरा किसमें कितना है दम

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना थेट इशारा दिला आहे. मोहित कंबोज यंत्रणेला हाताशी धरून धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो. तुझी सत्तेची मस्ती आणि माज उतरावयला वेळ लागणार नाही. आ देखे जरा किसमें कितना है दम, अशा आशयाचे ट्विट सुरज चव्हाण यांनी केले आहे. 

मोहित कंबोजचीही चौकशी झाली पाहिजे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही मोहित कंबोज यांच्यावर टीका केली. मोहित कंबोज यांनीच भोंगे वाटले होते. ते भाजपाचे भोंगे आहेत. शेतकरी, जीसएटीच्या प्रश्नावर बोलताना ते दिसत नाहीत. ईडीच्या दारात बसून त्यांनी ही माहिती मिळवली आहे का? मोहित कंबोजचीही चौकशी झाली पाहिजे. ईडी कोणाच्या घरी धाड टाकेल त्यासंबंधी ट्वीट करत असेल, पत्रकार परिषद घेणार असतील तर हे संशयास्पद आहे. मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता, माणूस, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे सर्वांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका अमोल मिटकरींनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनीदेखील मोहित कंबोज यांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात पोट भरायला आलेला, महाराष्ट्राला बोट दाखवायला लागला, असे म्हणत रुपाली पाटील यांनी कंबोज यांचा नवा सोमय्या म्हणून उल्लेख केला आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा