शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

भंडाऱ्यात राष्ट्रवादीचे कर्जमुक्ती आंदोलन

By admin | Published: May 23, 2017 3:05 AM

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सोमवारी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात सोमवारी आंदोलन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रणरणत्या उन्हात ठिय्या मांडल्याने पोलिसांनी पटेलांसह कार्यकर्त्यांना अटक केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजल्यापासूनच त्रिमूर्ती चौकात धरणे आंदोलन करीत होते. भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यातून आलेले शेकडो शेतकरी व कार्यकर्ते रणरणत्या उन्हात मंडपात बसून होते. शेतकरी, बेरोजगारांच्या न्यायासाठी आपण आंदोलन करीत आहोत, अशा स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका खा. पटेल यांनी घेतली. मात्र, जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येणार नाहीत याची माहिती तहसीलदार संजय पवार तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी दिली. त्यामुळे दुपारी ३.२५च्या सुमारास खा. पटेल मंडपातून उठून महामार्गावर आले आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ रोखून धरला. तब्बल ४० मिनिटे ते कार्यकर्त्यांसोबत महामार्गावर बसून होते. जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारत नाहीत तोपर्यंत येथून उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दुपारी ४च्या सुमारास पटेलांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.