शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राष्ट्रवादीची वेगळी चूल

By admin | Published: December 18, 2015 2:42 AM

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, असे म्हणत गुरुवारी राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले.

-  अतुल कुलकर्णी,  नागपूरशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, असे म्हणत गुरुवारी राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. राष्ट्रवादीने मांडलेली वेगळी चूल लक्षात येताच काँग्रेसचे सदस्य धावपळ करत पायऱ्यांवर पोहोचले पण तोपर्यंत राष्ट्रवादीने आंदोलन गुंडाळून सभागृहात जाणे पसंत केले. विरोधकांमधील दुफळी समोर येऊ नये म्हणून कर्जमाफीच्या विषयावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी राज्यपालांना जाऊन भेटायचे आणि निवेदन देण्याचा निर्णय घेतला गेला. दुपारी कामकाज चालू असतानाच दोन्ही सभागृहातील प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीला गेले. त्यावेळी विधानपरिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात आले,पण विधानसभेत कामकाज बंद पाडणे विरोधकांंना शक्य झाले नाही. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलायचे असतानाही बुधवारी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभात्याग करतो असे घोषित केले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील यांनाही बोलायचे होते. सभात्यागाची घोषणा झाल्यानंतर काहीवेळ राष्ट्रवादीचे नेते सभागृहात रेंगाळले मात्र शेवटी तेही नाईलाजाने बाहेर पडले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची नंतर वेगळी चर्चा झाली आणि सकाळी काँग्रेसला न घेता आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी सकाळीच पायऱ्यांवर बैठक मारत, घोषणाबाजी सुरु केली. या आंदोलनाची माहिती कळताच काँग्रेसचे नेते पायऱ्यांकडे गेले पण तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन अशा बातम्या सुरु झाल्या होत्या. पायऱ्यांवर जमलेल्या पत्रकारांकडे राष्ट्रवादीचे काही नेते कालच्या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत होते. विधानपरिषदेचे कामकाज पहा आणि विधानसभेतला विरोधी पक्ष नेत्यांचे काम पहा, तुम्हीच तुलना करा, असेही काही ज्येष्ठ सदस्य बोलून दाखवत होते. नंतर मात्र दोन्ही काँग्रेसचे सदस्य सदस्य राज्यपालांना जाऊन भेटले.