शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

By admin | Published: July 19, 2016 3:06 AM

कल्याणसह ठाण्याचे खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली

ठाणे : कल्याणसह ठाण्याचे खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून सोमवारी ठाणे रेल्वे स्टेशन येथे त्रस्त ठाणेकरांच्या सह्यांची मोहीम पक्षाने आखली होती. या मोहिमेत सुमारे साडेसात हजार प्रवाशांनी आपला सक्रि य सहभाग नोंदवला. या प्रवाशांनी आपल्या समस्याही लिखित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे दिल्या. आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, आमदार निरंजन डावखरे, ठामपाचे विरोधी पक्षनेते संजय भोईर, महिला अध्यक्षा करिना दयालानी, युवक अध्यक्ष मंदार केणी आणि विद्यार्थी अध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मुंबई-ठाणे रेल्वेला १०० वर्षे होऊन गेली. रोज लाखो प्रवासी या स्टेशनचा वापर करतात. त्यातून कोट्यवधी रु पये रेल्वेला मिळतात. मात्र, प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो आहे. त्यातच ठाणेकरांनी या समस्या रेल्वे प्रशासनाकडे मांडून त्या सोडवण्यासाठी ज्या खासदारांची निवड केली आहे, ते अकार्यक्षम ठरले आहेत. म्हणूनच, राष्ट्रवादीने सोमवारी ठाणे रेल्वे स्टेशन पश्चिम येथे सकाळी ८ वाजता सह्यांची मोहीम घेतली होती. सुमारे ७ हजार ७४९ त्रस्त ठाणेकरांनी सह्या करून आपल्या कैफियती मांडल्या. या सह्यांचे निवेदन आनंद परांजपे यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवले. या वेळी अकार्यक्षम खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाचा धिक्कारही केला. या वेळी अनेक प्रवाशांनी आपल्या समस्याही या स्वाक्षरी वहीवर नोंदवल्या. ठाणे स्थानकात लिफ्टही वेळेत सुरू करण्यात येत नाहीत. फलाट क्र मांक १० वरील शौचालये बंद आहेत. स्टेशनमधील अनेक एटीव्हीएम यंत्रेही बंदावस्थेत आहेत. तिकीट खिडक्याही अनेकदा गर्दीच्या वेळीच बंद असतात, आदी समस्याही प्रवाशांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ठाण्याचे दोन्ही खासदार रेल्वेच्या समस्या सोडवण्यास अपयशी ठरले आहेत. या अपयशी खासदारांचा त्रास ठाणेकरांना सोसावा लागत आहे, असे परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.>प्रशासनामुळे कुचंबणासुमारे ७ हजार ७४९ त्रस्त ठाणेकरांनी सह्या करून आपल्या कैफियती मांडल्या. या सह्यांचे निवेदन आनंद परांजपे यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवले. या वेळी अकार्यक्षम खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाचा धिक्कारही करण्यात आला.रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची कुचंबणा होत आहे. त्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो आहे.