शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

संमेलनाध्यक्षांची निवडप्रक्रिया बदलण्याची गरज : शरद पवार

By admin | Published: January 17, 2016 1:01 AM

‘‘मते मिळविणे हे आम्हा राजकारणी लोकांचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलण्याची गरज आहे. माजी संमेलनाध्यक्षांनी एकत्र

- हणमंत पाटील, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) ‘‘मते मिळविणे हे आम्हा राजकारणी लोकांचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये. संमेलनाध्यक्ष निवडीची पद्धत बदलण्याची गरज आहे. माजी संमेलनाध्यक्षांनी एकत्र येऊन पुढील अध्यक्षांची निवड करावी,’’ अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी संमेलनाध्यक्ष निवडप्रक्रियेची पद्धत बदलण्याचा सल्ला दिला. पिंपरी-चिंचवड येथील ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी त्यांनी निवडीचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात निवडणूकप्रक्रिया बदलण्याविषयी पवार यांच्या मताला अनुमोदन दिले. साहित्य संमेलन अध्यक्ष निवड मतदान प्रक्रियेमुळे होत असल्याने अनेक चांगले साहित्यिक संमेलनापासून दूर राहणे पसंत करतात. हे चित्र बदलण्यासाठी निवडप्रक्रिया बदलावी लागेल. मते मिळविण्यासाठी आम्हाला काय काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती नाही. तो आमचा अधिकार आहे. त्याविषयी उघडपणे बोलणार नाही. चार ते पाच माजी अध्यक्षांची एकत्र समिती तयार केली, तर या समितीद्वारे खऱ्या अर्थाने उत्तम साहित्यिकांना संधी मिळू शकते. धर्मनिरपेक्षता व सहिष्णुता हे चर्चेत असलेले शब्द उच्चारण्यासाठी जितके कठीण आहेत तसेच, ते आचरणात आणण्यासाठी कठीण आहेत, असे पवार यांनी सांगितले. पवारांचा हात असल्याचा गैरसमजमहाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीत शरद पवार यांचा हात असल्याचा समज पसरवला जातो. काही तथाकथित विचारवंतांच्या म्हणण्यानुसार संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीतही माझा हात असल्याचा आरोप होतोय, अशा पद्धतीने आम्हाला वादात ओढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सबनीस यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयुष्यात मी त्यांना प्रथमच भेटलो. उद्या लातूर व कोयनेला भूकंप झाला, तरी पवार यांचा हात असल्याचा समज पसरविला जाईल.- शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री