शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

संस्कारी पिढीची देशाला गरज

By admin | Published: October 24, 2016 12:50 AM

ज्ञानाच्या अंधकारात असणाऱ्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम गुरुकुल करीत आहे. अत्याधुनिक शिक्षणाप्रमाणेच मुलांवर चांगले संस्कार होणेदेखील महत्त्वाचे आहे

पिंपरी : ज्ञानाच्या अंधकारात असणाऱ्या मुलांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम गुरुकुल करीत आहे. अत्याधुनिक शिक्षणाप्रमाणेच मुलांवर चांगले संस्कार होणेदेखील महत्त्वाचे आहे. अशी संस्कारी पिढी तयार करण्याची देशाला गरज असल्याचे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला आज त्यांनी भेट दिली. या वेळी समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलमची माहिती दिली. या वेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, गिरीश आफळे, अ‍ॅड. सतीश गोरडे, मुख्याध्यापिका पूनम गुजर, रवी नामदे, विलास लांडगे, नितीन बारणे, गतीराम भोईर, शकुंतला बन्सल, मधुसूदन जाधव उपस्थित होते.पाटील म्हणाल्या, ‘‘स्वातंत्र्यानंतर देशामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात आला. त्या वेळी शिक्षणाची टक्केवारी कमी होती. ही टक्केवारी वाढवण्यासाठी शासनाने अनेक शाळा, महाविद्यालये सुरू केली. या ठिकाणी हजारो, लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे देशाचे प्रश्न सुटतील असे वाटले होते; पण आपण केवळ बेरोजगार पिढी तयार करीत आहोत. शिक्षणामुळे अत्याधुनिक पद्धतीकडे आपण गेलो. परंतु शिकून बाहेर पडणाऱ्या पिढीच्या हाताला आणि मेंदूला काम दिले गेले पाहिजे. परंतु त्यांना जेवढ्या संधी प्राप्त करून द्यायला हव्या होत्या, तेवढ्या प्राप्त करून देऊशकलो नाही. त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची सध्या गरज आहे. शिक्षण तज्ज्ञांच्या मते शिक्षण भरपूर दिले जात आहे. तंत्रज्ञ निर्माण करतोय, शास्त्रज्ञ निर्माण करतोय, सर्व काही देतोय; पण मूल्यांवर आधारित शिक्षण दिले गेले पाहिजे. या वेळी गिरीश आफळे यांनी मनोगत व्यक्त केले. कल्पना बिचकुले हिने सूत्रसंचालन केले, तर सचिन राठोड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)