शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
2
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
3
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
4
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
5
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
6
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
7
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
8
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
9
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
10
धक्कादायक! पोस्टमार्टमपूर्वीच तरुण स्ट्रेचरवरुन उभा राहिला, म्हणाला, "मी जिवंत आहे भाऊ"; हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली
11
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
12
Shankh Air Airline : Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी
13
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या
14
पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले
15
Gold Silver Price Rate Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह रेट
16
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
17
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
18
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
19
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
20
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले

शिक्षणात क्रांती होण्याची गरज

By admin | Published: January 15, 2016 1:40 AM

जागतिक स्तरावरील दर्जाच्या स्पर्धेत उतरायचे असेल, तर मुंबईसह देशातील विद्यापीठांना अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे संगोपन या तीनही विभागांत क्रांतीची गरज असल्याचे

मुंबई : जागतिक स्तरावरील दर्जाच्या स्पर्धेत उतरायचे असेल, तर मुंबईसह देशातील विद्यापीठांना अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे संगोपन या तीनही विभागांत क्रांतीची गरज असल्याचे मत प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. बाळकृष्ण पिसुपती यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापाठीच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात पार पडलेल्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.पिसुपती म्हणाले की, ‘रोजच्या शैक्षणिक विश्वापार काही गोष्टी वाचून समजून घेण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त करायला हवे. आधुनिक शिक्षणासमोरील हे मोठे आव्हान आहे. फक्त पाठ्यक्रमावर आधारित शिक्षण न देता, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार असणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नवे संशोधन प्रकल्प देऊन साधणार नाही, तर विद्यार्थी आणि शिक्षकांनाही प्रशिक्षण आणि नवे वळण द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी आवडेल तेच करता येईल, असे मार्ग शोधायला हवेत. तसे करताना जोखीम स्वीकारण्याची तयारीही ठेवावी लागेल. फक्त हे सर्व करताना निष्ठेला कधीही वेठीस धरू नका. कारण निष्ठा ही यशाचा पाया आहे,’ असे पिसुपती या वेळेस म्हणाले. या वेळी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव हे अध्यक्षस्थानी होते, तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या उपस्थित दीक्षांत समारंभ पार पडला. गेल्या पाच वर्षांत विथ्द्यापीठात १०७ टक्क्यांनी पदवी आणि ११८ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, तर दुरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १६२ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये १७१ टक्क्यांनी संशोधन पेपर्समध्ये वाढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले. गेल्या पाच वर्षांत १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांचा गौरव केल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.डिजिटल विद्यापीठ!नजीकच्या काळात मुंबई विद्यापीठात अनेक आॅनलाइन अभ्यासक्रम राबविले जाणार असून, त्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सहभागी होत, विद्यापीठाने अनेक महत्त्वाकांक्षी आणि अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ज्यामध्ये डिजिटल विद्यापीठ, कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम, इन्क्लुझिव लीडरशीप असे महत्त्वाचे उपक्रम विद्यापीठ येत्या काळात राबविणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.एक लाखाहून अधिक पदव्या या वर्षीच्या दीक्षान्त सोहळ््यात पदवी आणि पदव्युत्तर मिळून १ लाख ४६ हजार २४८ पदव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये १ लाख २१ हजार ८२९ पदवी आणि २४,४१९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कलाशाखेच्या २५,३१०, विज्ञानच्या १७ हजार २०७, वाणिज्यमधील ६४,७३८, तंत्रज्ञान शाखेतील २१,३५८, व्यवस्थापनात १२,१७४ आणि विधी शाखेच्या ५,४६१ विद्यार्थ्यांना पदव्या बहाल करण्यात आल्या आहेत. २७१ पीएच. डी आणि ३६ एमफील पदवी बहाल करण्यात आल्या आहेत, तर ६१ सुवर्ण पदक, १ रौप्य पदक, ३ कांस्य पदक, २ कुलपती पारितोषिक आणि १ कुलपती पदक बहाल केले आहे.