शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी स्वतंत्र प्रकल्पाची गरज

By admin | Published: June 05, 2017 2:49 AM

स्वच्छ शहर म्हणून मानांकन प्राप्त झालेल्या नवी मुंबई शहरात सद्यस्थितीला दैनंदिन घनकचऱ्याचे सुयोग्यरीत्या व्यवस्थापन केले जाते.

प्राची सोनवणे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशात आठवे आणि राज्यात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकन प्राप्त झालेल्या नवी मुंबई शहरात सद्यस्थितीला दैनंदिन घनकचऱ्याचे सुयोग्यरीत्या व्यवस्थापन केले जाते. असे असले तरीही विघटन न होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प शहरात सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. प्रत्येकाने स्वत:च्या परिसरात निर्माण होणाऱ्या घन कचऱ्याचे प्रमाण कमीत कमी करण्याचे प्रयत्न करायलाच हवेत. त्यापुढची पायरी म्हणजे नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण चार प्रकारांत करावे, असे अपेक्षित आहे. रिसाइकलेबल (पुन्हा प्रक्रिया करता येण्यासारखा), रियुसेबल (आहे त्याच स्वरूपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरता येईल असा), बायोडिग्रेडेबल (विघटन होणारा) आणि प्रक्रि या न करता येण्याजोगा कचरा. असे वर्गीकरण केल्यावर विघटन होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करून त्याचा खत म्हणून वापर करण्याची जबाबदारी नागरिकांनी उचलणे आवश्यक आहे. नवी मुंबईत ४४६.४८ टन ई-कचरा जमा होतो. ई-कचऱ्याची हाताळणी आणि विल्हेवाट लावणे, ही दिवसेंदिवस एक गंभीर समस्या बनत चालली आहे. या ई-कचऱ्यात विविध प्रकारचे धातू आणि अ‍ॅसिडिक गुणधर्म असलेले पदार्थ असल्याने ते जाळल्यास त्यातून होणाऱ्या उत्सर्जनामुळे मोठा धोका निर्माण होतो. हा ई-कचरा जमिनीत गाडणे किंवा जाळून टाकणे, पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरते. सर्वात चिंतेची बाब हा ई-कचरा अजूनही भंगारवालेच खरेदी करतात, ज्यांच्याकडे वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही. वेंगुर्ले नगरपरिषदेचा अभिनव उपक्रमवेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या पुढाकाराने संपूर्ण शहर प्लास्टिकमुक्त केले जात असून, या ठिकाणी असलेला कचरा बाहेर न जाता येथेच या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, पूर्ण वापर आणि पुनर्वापरावर अधिक भर देण्यात आली आहे. वेंगुर्ल्यामध्ये सुका, ओला, प्लास्टिक, काच आणि धातू अशा चार वर्गांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. सुक्या कचऱ्यातील कागद ३ रुपये किलो, पुठ्ठा ६ रुपये किलो दराने विकला जातो. कचऱ्यात येणारे कापड व रेक्झीन बॅग्ज सिमेंट कंपनीला देण्यात येते. स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई शहर चांगली उंची गाठत असले, तरीदेखील कचरा प्रक्रियेवर स्वतंत्रपणे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. यामध्ये पर्यावरणप्रेमींना तसेच नागरिकांना सहभागी करता येऊ शकते. जुईनगर परिसरात खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, काही काळानंतर मात्र पैशांअभावी तसेच अपुऱ्या प्रोत्साहनामुळे हा प्रकल्प बंद पडला. महापालिकेने स्थानिक स्तरावर पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे.- सुनील नाईक, पर्यावरणप्रेमी.