शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

अंगावरच्या हळदीसह नववधू बेपत्ता !

By admin | Published: July 16, 2016 12:29 PM

लग्न होऊन आठवड्याचाही कालावधी उलटत नाही तोच अंगावरच्या हळदीसह नववधू गायब झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १६ - लग्न होऊन आठवड्याचाही कालावधी उलटत नाही तोच अंगावरच्या हळदीसहच नववधू गायब झाली. यासंदर्भात नवरदेवाने थेट पोलीसात तक्रार दिली असून पोलीस आता या नववधूचा शोध घेत आहेत.
 
गांधनवाडी गावातील ठकराम खेंगरे या तरूणाचा आठ दिवसापूर्वीच विवाह झाला होता. घरातील विविध धार्मिक कार्ये सुरूच होती. दरम्यान नववधूने आपली तब्यत बरी नाही, असे सांगितल्याने ठकराम याने तिला घेऊन नजिकच्या अंमळनेर येथील खासगी रूग्णालय गाठले. डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर तिने त्याला औषधे कसे घ्यायचे, हे आपल्या लक्षात राहिले नाही, डॉक्टरांना विचारून या, असे सांगितले. ठकराम डॉक्टरांकडे गेला आणि अवघ्या पाच मिनिटात परतल्यावर त्याला पत्नी जागेवर नसल्याचे दिसले. या नंतर त्याने आजुबाजुला शोध घेतला परंतु ती काही त्याला सापडलीच नाही. अखेर दिवसभर शोधाशोध केल्यानंतर त्याने पोलीसात धाव घेऊन पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली.