शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 19:57 IST

नाना पटोलेंनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nana Patole On DGP Sanjay Kumar Verma : महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीवरुन राजकारण तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून संजय कुमार वर्मा यांच्या सशर्त नियुक्तीबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारने संजय कुमार वर्मा यांची डीजीपी पदावर सशर्त नियुक्ती करणे हे घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि प्रस्थापित प्रशासकीय तत्त्वांचे उल्लंघन असल्याचा आरोप या पत्रातून केला आहे.

पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थपणे व निःपक्षपातीपणे काम करण्यास अडचणी येणार असल्याचे नाना पटोले आपल्या पत्रात म्हणाले आहेत. संजय कुमार वर्मा यांच्या तात्पुरत्या नियुक्तीच्या आदेशावर निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नाना पटोले यांचे EC ला पत्रनाना पटोले आपल्या पत्रात लिहितात, "निवडणूक आयोगाने घटनेच्या कलम 324 अन्वये घटनात्मक अधिकार वापरून, 5 नोव्हेंबर 2024 रोजी संजय कुमार वर्मा यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलीस दलाने निष्पक्ष आणि तटस्थ भूमिका बजावावी, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, निवडणूक आयोगाच्या या सूचनेचे उल्लंघन करून महाराष्ट्र सरकारने संजय वर्मा यांच्या नियुक्तीला आचारसंहितेनुसार मर्यादा घालण्याचा/नियुक्ती आचार संहितेपर्यंत करणारा आदेश जारी केला आहे.'

"संजय कुमार वर्मा यांच्या सशर्त नियुक्तीमुळे पोलिस दलाचे नेतृत्व आणि प्रशासकीय सातत्य धोक्यात आले आहे. निवडणुकीनंतर रश्मी शुक्ला यांची पुन्हा डीजीपी म्हणून नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा हेतू असेल, तर त्यामुळे कायदेशीर आणि प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते. बेट लावल्याने डीजीपीच्या कामगिरीवरही परिणाम होतो. पोलीस महासंचालक आणि मतदानोत्तर पोलीस महासंचालक यांची नियुक्ती प्रशासनाच्या मूलभूत घटनात्मक तत्त्वांवर, पदानुक्रमावर आणि अधिकारांचे पृथक्करण यावर परिणाम करते. राज्य सरकारच्या या कृतीमुळे घटनात्मक संतुलन बिघडू शकते आणि कायदेशीर अनिश्चितता निर्माण होऊ शकते," असे नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग