शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

नव्या पिढीची नवी पत्रकारिता जोमात

By admin | Published: June 10, 2017 1:00 AM

पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे ज्यातून सामाजिक, राजकीय स्तर वाढतो, सत्ता मिळते आणि आपला प्रभाव वाढतो. आधुनिक भांडवलशाहीचा प्रसार

पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे ज्यातून सामाजिक, राजकीय स्तर वाढतो, सत्ता मिळते आणि आपला प्रभाव वाढतो. आधुनिक भांडवलशाहीचा प्रसार आणि तंत्रज्ञान यामुळे स्वत:चे वर्तमानपत्र काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आहे. वर्तमानपत्राच्या जोडीला आता वेबसाइट काढणे, यूट्यूब चॅनल काढणे, सोशल मीडियावर माहितीचा प्रसार करणे इत्यादीसुद्धा करता येते.बिन जेफ्रीच्या ‘इंडियाज न्यूजपेपर रेव्हल्यूशन’ या पुस्तकात तो दाखवतो की भांडवलशाही आणि माहिती व माध्यम तंत्रज्ञानामुळे भारतात वर्तमानपत्रांची कशी क्रांती होते आहे. भारतातील वर्तमानपत्रांचे जग हे जगातील इतर देशांपेक्षा फार वेगळे आहे. भाषा, विषय, कुठल्या घटनांचे रूपांतर बातमीत कशामुळे होते, वाचकांचा सामाजिक, राजकीय कल आणि आर्थिक परिस्थिती याचे जितके वैविध्य भारतात दिसते, तितके ते जगात इतरत्र कुठेही आढळत नाही.भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस सर्वाधिक लोक निरक्षर होते. साक्षरता हा युरो-अमेरिकन जगातील आधुनिक विचार. त्याचबरोबर सर्वाधिक लोक गरीब होते. ही गरिबी जवळ जवळ हजार वर्षांची होती. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळची आपली शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, रोजगार इत्यादींची धोरणे त्या वास्तवाला धरून होती. आज परिस्थिती बदलली आहे. अर्ध्याहून अधिक लोक आता साक्षर आहेत. या समाजाने औपचारिक शिक्षण घेतले आहे. यात दिवसेंदिवस झपाट्याने भर पडत चालली आहे. याचा अर्थ येत्या दशकात भारतातील सर्वाधिक लोकसंख्या औपचारिक शिक्षण घेतलेली असेल.भारतातील औपचारिक शिक्षण हे सर्वाधिक प्रमाणात सरकार देत होते. त्यामुळे औपचारिक शिक्षणाचा रोजगाराशी संबंध जोडण्याचे काम सरकारनेच केले. सरकारनेच सर्वाधिक रोजगार पुरविला. मात्र तसे करताना निकष सामाजिक आणि राजकीय लावले गेले. विषयज्ञान, अनुभव, कसब, कुशलता हे गौण होते. हळूहळू मात्र सरकारला हे ओझे पेलेनासे झाले आणि मग रीतसर नोकरकपातीला सुरुवात झाली. याच वेळी औपचारिक शिक्षण देणारी खाजगी यंत्रणा सुरू झाली. अर्थात ही बाहेरून जरी खाजगी वाटत असली तरी यामागे राजकारणी मंडळीच होती. आता यात व्यापारी आणि दुकानदार मंडळी आली आहेत. एक छोटा गट आहे धार्मिक संस्थांचा जो औपचारिक शिक्षणात काम करतो. मात्र हे सगळे जरी असले तरी रोजगारनिर्मिती अजूनही सरकारच करते आहे. आयटी क्षेत्र वगळता खाजगी क्षेत्र यात फारसे प्रभावी नाही. पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे ज्यातून सामाजिक, राजकीय स्तर वाढतो, सत्ता मिळते आणि आपला प्रभाव वाढतो. आधुनिक भांडवलशाहीचा प्रसार आणि तंत्रज्ञान यामुळे स्वत:चे वर्तमानपत्र काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आहे. वर्तमानपत्राच्या जोडीला आता वेबसाइट काढणे, यूट्यूब चॅनल काढणे, सोशल मीडियावर माहितीचा प्रसार करणे इत्यादीसुद्धा करता येते. यामुळे अनेक तरुण आता स्वत:चे वर्तमानपत्र काढताहेत. त्यांचे विषय, विषय हाताळणी, भाषा, वाचक, बातमीमूल्ये वेगवेगळी आहेत. आजपर्यंत भाषा, विषय, मूल्ये, नैतिकता, आर्थिक व व्यापारी गणिते, राजकीय आणि सामाजिक जबाबदारीच्या ज्या चौकटीत वर्तमानपत्रे वावरत होती ती सगळीच्या सगळी या नवीन पिढीने झुगारून देऊन स्वत:ची नवीन पत्रकारिता करायला सुरुवात केली आहे.या सर्व प्रक्रियेतून जाताना भारतात संपूर्णपणे नवीन ‘नॅरेटिव्ह’ तयार होताहेत. पत्रकारितेतून समाज आपली कथा मांडत असतो. वर्तमानपत्र समाजाची अभिव्यक्ती असते. समाज आपले वास्तव मांडत असतो, ते वास्तव बदलत असते, त्यातून समाज शिकत जातो. प्रत्येक समाजाची चांगल्या जीवनाची स्वत:ची व्याख्या असते. ही व्याख्या आता बदलते आहे.या सगळ्यातून पैसा मिळेल काय? याचे उत्तर पैसा कशासाठी हवा आहे, या प्रश्नात आहे. या सगळ्यातून पुस्तके विकत घेण्यासाठी, प्रवास करण्यासाठी, माणसे जोडण्यासाठी, समाज, राजकारण, अर्थकारण समजण्यासाठी, समाजात प्रतिष्ठा मिळविण्यासाठी, माणूस म्हणजे काय हे समजण्यासाठी, आत्मभान मिळविण्यासाठी लागतो तेवढा पैसा आहे.मग पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण घ्यावे काय? तर निश्चित घ्यावे. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की भारतातील औपचारिक शिक्षणाला संस्थांच्या मर्यादा असतात. प्रत्येक संस्थेच्या स्वत:च्या मर्यादा असतात. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्याला हे भान असले पाहिजे की अभ्यासक्रमाचा सर्वाधिक उपयोग त्याला स्वत:ला करायचा आहे. तो कसा, कशासाठी, किती करायचा हे जर निश्चित असेल तर कुठलाही अभ्यासक्रम कुठल्याही संस्थेत राबविला जात असला तरी त्यातून आपल्याला काय हवे आहे ते निश्चित काढता येते. औपचारिक शिक्षणाचा थेट संबंध रोजगाराशी आहे आणि प्रत्येक रोजगार क्षेत्र विशिष्ट आर्थिक चक्रात फिरत असते. त्यामुळे सध्या रोजगार कुठल्या परिस्थितीत आहे व आपण क्षेत्रात येऊ त्या वेळेस तो कुठल्या परिस्थितीत असेल याचे निश्चित भान मिळविणे आवश्यक असते. ते भान त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून मिळविता येते. टीप- सर्व प्रमुख विद्यापीठांसह प्रमुख महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पत्रकारितेचे धडे गिरवता येऊ शकतात. कोर्सेस आणि अभ्यासक्रमाची विपुल माहिती इंटरनेटवरून मिळवणे सहज शक्य आहे.- डॉ. संजय रानडेलेखक मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख आहेत