शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

लातुरमध्ये देशमुखविरुद्ध निलंगेकर लढाई

By admin | Published: January 20, 2017 12:09 AM

लातूर जिल्ह्यात राजकीय पक्षांची आघाडी वा युती झाली अथवा नाही झाली तरी खरी लढाई देशमुखविरुद्ध निलंगेकर अशीच राहाणार आहे.

दत्ता थोरे,

लातूर- लातूर जिल्ह्यात राजकीय पक्षांची आघाडी वा युती झाली अथवा नाही झाली तरी खरी लढाई देशमुखविरुद्ध निलंगेकर अशीच राहाणार आहे. विलासरावांचे धोरले चिरंजीव अमित देशमुख यांच्या पाठोपाठ आता धाकटे चिरंजीव धीरज यांचेही राजकारणात पदार्पण होऊ घातले असून त्यांच्या ‘लाँचिंग’साठी काका दिलीपराव देशमुख यांनी मोर्चेबांधणी केली आहे,जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या गटाला असल्याने धीरज देशमुख यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने तगडे आव्हान उभे केले आहे. १९८२ साली लातूर जिल्हा परिषदेची स्थापना झाली. माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख हे पहिले अध्यक्ष. तेव्हापासून आजतागायत जिल्हा परिषदेवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. शिवाय, देशमुखांच्या गढीवरच जि. प. च्या किल्ल्या कायम राहिल्या. सध्या काँग्रेसकडे ३५ जागा आहेत, तर भाजपाकडे आठ, राष्ट्रवादीचे नऊ तर सेनेचे पाच सदस्य आहेत. सेनेला जिल्ह्यात चेहरा नाही. तर राष्ट्रवादी ‘गट’बंबाळ झालीय. त्यामुळे झुंज होईल ती काँग्रेस विरुध्द भाजपातच. नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्व ठिकाणी सत्तेच्या भरल्या पंक्तीतून उठावे लागले. आधी लोकसभा, नंतर विधानसभा, नगरपंचायत आणि आता नगरपरिषद या सर्वच ठिकाणांहून जिल्ह्यात काँग्रेसला कुठेही समाधानकारक यश मिळाले नाही. बालेकिल्ल्यात चोहोबाजूंनी अशा पडझडीच्या मौसमात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. लातूर (१०), औसा (९), निलंगा (९), उदगीर (७), आणि अहमदपूर (६) या पाच तालुक्यात ४१ जागा आहेत. पैकी उदगीरसह जळकोटवर भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव, अमहदपूरमध्ये नुकतेच भाजपात आलेले आमदार विनायक पाटील तर देवणी, शिरुरअनंतपाळ आणि निलंग्यावर खुद्द संभाजीराव पाटील यांचे वर्चस्व आहे. तर काँग्रेसकडे अमित देशमुख (लातूर) , त्र्यंबक भिसे (लातूर ग्रामीण) व बस्वराज पाटील (औसा) असे राजकीय पाठबळ आहे. शिवाय, या निवडणुकीची सर्व सुत्रे दिलीपराव देशमुख यांनी हाती घेतल्याने त्यांचे ‘मॅनेजमेन्ट’ कौशल्य पणाला लागले आहे. या जिल्ह्याने पूर्वी विलासरावविरुद्ध शिवाजीराव पाटील निलंगेकर असा राजकीय संघर्ष पाहिला आहे. कालांतराने दोन्ही गटात समेट घडून विलासराव व निलंगेकर एकत्र आले. आता दुसऱ्यापिढीत पुन्हा हा संघर्ष उभा ठाकला आहे. विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुख यांची जिल्हा परिषदेत एन्ट्री रोखण्यासाठी संभाजीराव निलंगेकर यांनी कंबर कसली आहे.सुरुवातीला अध्यक्षपद हे महिलेला राखीव होते. परंतु नव्याने झालेल्या सोडतीत ते खुुल्या गटाला आले. या अदलाबदलीत देशमुख परिवाराला धीरज देशमुख यांच्या ‘पॉलिटिकल लॉचिंग’चे वेध लागले आहेत.