शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
3
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
4
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
5
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
6
Suraj Chavan : "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
7
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
8
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
9
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
10
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
11
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
12
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
13
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
14
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
15
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
16
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
17
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
18
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
19
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
20
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

..अन झाले ‘कालिदास’चे नामकरण!

By admin | Published: July 05, 2016 12:49 PM

‘मेघदूत’सारखे अजरामर महाकाव्य लिहिणाऱ्या महाकवी कालिदासांच्या स्मृतींना आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उजाळा दिला जात असला, तरी नाशिकमध्ये मात्र खास महापालिकेच्या वतीने कालिदास दिन साजरा केला जातो

सुदीप गुजराथी
ऑनलाइन लोकमत, नाशिक : 
‘मेघदूत’सारखे अजरामर महाकाव्य लिहिणाऱ्या महाकवी कालिदासांच्या स्मृतींना आषाढाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उजाळा दिला जात असला, तरी नाशिकमध्ये मात्र खास महापालिकेच्या वतीने कालिदास दिन साजरा केला जातो. त्याला कारणीभूत आहे ती महाकवी कालिदास कलामंदिर ही वास्तू... कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या वास्तूला स्वत:चे नाव देणे नाकारून कालिदासांच्या स्मृती जपल्याने नाशिकमध्ये दरवर्षी हा योग जुळून येतो. 
नाशिकमध्ये शालिमार परिसरात महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर ही वास्तू उभारण्यात आली. तत्पूर्वी, सन १९५५-५६ मध्ये याच ठिकाणी तत्कालीन नगरपालिकेच्या वतीने खुले नाट्यगृह बांधण्यात आले. ते काही वर्षे व्यवस्थित चालल्यानंतर पुढे त्याची रया गेली व बंद पडले. डॉ. वसंतराव गुप्ते यांच्यासह काही लोकप्रतिनिधी व रंगकर्मींनी या जागेवर नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव मांडला; मात्र सन १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या कामाला गती आली. या वास्तूचे भूमिपूजन महापालिकेचे प्रथम प्रशासक सुधाकर जोशी यांच्या हस्ते झाले, तर रत्नाकर कुलकर्णी यांच्या कारकीर्दीत ते बांधून पूर्ण झाले. त्याच्या बांधकामासाठी १७५ लाख रुपये खर्च आला. गुढीपाडव्याला दि. ३० मार्च १९८७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत या नाट्यमंदिराचे उद्घाटन झाले. 
दरम्यान, या वास्तूच्या देखरेखीसाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यात कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, शंकरराव अंधृटकर, हेमंत टकले आदिंचा समावेश होता. तर मधुकर झेंडे हे कलामंदिराचे प्रथम व्यवस्थापक होते. या वास्तूला कोणाचे नाव द्यावे, याविषयी विचारविनिमय सुरू झाला व कुसुमाग्रजांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले. कुसुमाग्रजांसारखा प्रतिभावंत कवी व साहित्यिक शहरात असताना, अन्य दुसºया कोणाच्या नावाचा विचारही करण्याची गरज नव्हती; मात्र हा प्रस्ताव ऐकल्यावर तात्यासाहेबांनी तो मोठ्या खुबीने नाकारला. ‘आपण हयात असताना एखाद्या वास्तूला आपले नाव देणे योग्य वाटत नाही. पुढे कोणी कोठे ना कोठे आपले नाव देईलच’, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यावर अन्य मान्यवरांनी आपले नाही, तर किमान आपल्या नाटकाचे- ‘नटसम्राट’चे नाव देण्याला तरी मान्यता द्यावी, अशी विनंती केली; मात्र तात्यासाहेबांनी त्यालाही नकार देत महाकवी कालिदासांचे नाव देण्याचा पर्याय सुचवला. त्यामुळे त्यांच्या नावासाठी आग्रही असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला. कालिदासांसारख्या महान कवीचे नाव देशात अन्यत्र कोठेही दिले जाईल; पण कुसुमाग्रजांचे नाव नाशिकशिवाय अन्य कोठे दिले जाणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला; मात्र कुसुमाग्रजांनी त्याला बगल देत अत्यंत विनम्रतेने आपल्या नावाच्या प्रस्तावाला नकार कायम ठेवला व अखेर या वास्तूचे ‘महाकवी कालिदास कलामंदिर’ असे नामकरण करण्यात आले.  
दरम्यान, कालिदासांच्या नावाचे कोंदण लाभल्याने आजही दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने खास कार्यक्रम आयोजित केला जातो व त्यातून कालिदासांच्या स्मृतीला उजाळा मिळतो. नाट्य परिषद व अन्य संस्थांच्या वतीने नाट्यप्रयोग, काव्यवाचन, नृत्य आदि कार्यक्रम सादर केले जातात. याशिवाय शहरात अन्य संस्थांच्या वतीनेही कालिदास दिनानिमित्त गायन-वादनासह विविध उपक्रम आयोजित केले जातात.  यानिमित्त कवी कालिदासांचे स्मरण होते. अन्य शहरांत हा दिवस केवळ शाळा-महाविद्यालयांपुरताच मर्यादित राहतो. नाशकात मात्र तात्यासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे महाकवी कालिदास हे येथील सांस्कृतिक क्षेत्रात स्थान कायम ठेवून आहेत.
 
‘ते’ शिल्प पडद्याआड
महाकवी कालिदास लिखित ‘शाकुंतल’ नाटकातील दुष्यंत-शकुंतला या पात्रांचे शिल्प महाकवी कालिदास कलामंदिराच्या समोर असलेल्या विस्तीर्ण पिंपळाच्या झाडाखाली साकारण्यात आले होते. प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांनी ते तयार केले होते; मात्र तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी हे पिंपळाचे झाड कोसळल्याने त्याखालचे शिल्पही उद्ध्वस्त झाले. त्याची पुनर्उभारणी केली जाणार होती; मात्र त्याला अद्याप मुहूर्त लागू शकलेला नाही.