शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्या

By admin | Published: April 16, 2016 2:51 AM

राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचा शेरा देऊन पुनर्परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक

मुंबई : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचा शेरा देऊन पुनर्परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांकडे केली आहे. इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेवर नापास ऐवजी कौशल्य विकसित असा शेरा करण्याची घोषणा तावडे यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिक्षण प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. दहावी व बारावीचा निकाल जास्त लागावा म्हणून काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांत अभ्यासात कमकुवत असलेल्या नववी व अकरावी मधील विद्यार्थ्यांना नापास केले जाते. त्यामुळे नापास झालेली मुले दहावी आणि बारावीसाठी बाहेरून अर्ज करतात. मात्र त्यांतील बहुतांश विद्यार्थी पुन्हा नापास झाल्यावर शिक्षण प्रवाहातून बाहेर पडतात. जर पहिली ते आठवी व दहावीतील विद्यार्थी यांच्या गुणपत्रिकेवरील नापासाचा शेरा हद्दपार झाला आहे, तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही ताबडतोब पुनर्परीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी सरकारने आदेश देण्याची मागणी सुळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)असे करता येईल नियोजन१ मेपर्यंत नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षित असतो. त्यामुळे परीक्षांना नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला जाईल. त्यानंतर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात नापास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येईल, ज्याचा निकाल परीक्षा झाल्याच्या आठ दिवसांत लावला जाईल. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुढील इयत्तेसाठी प्रवेश देता येईल. जेणेकरून विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही.