शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Election 2019: कणकवलीत अटीतटीची लढत! नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

By वैभव देसाई | Updated: October 4, 2019 15:54 IST

नितेश राणेंच्या भाजपा उमेदवारीमुळे तळकोकणातील राजकारणात वेगळीच रंगत आली

- वैभव देसाईगेल्या अनेक दिवसांपासून भाजपात जाण्यास उत्सुक असलेल्या नारायण राणेंचा पक्ष प्रवेश कधी होणार, याचीच कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिलेली होती. राणेंचा पक्ष प्रवेश झाला नसला तरी राणेंचे पुत्र नितेश राणेंना भाजपानं कणकवलीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकूणच तळकोकणातील राजकारणात वेगळीच रंगत आली आहे. भाजपाच्या प्रमोद जठार यांनी माघार घेत आमदारकीसाठी नितेश राणेंचं नाव पुढे केल्याचं कणकवलीतल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते अतुल काळसेकरांनी सांगितलं. एकंदरीतच भाजपानं टाकलेल्या या गुगलीनं कणकवली मतदारसंघातून इच्छुक असलेले संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नितेश राणेंना भाजपाकडून एबी फॉर्म मिळाल्यानं ते भाजपाचेच अधिकृत उमेदवार असल्याचं निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे भाजपाने कणकवलीतून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपाचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्याविरोधात एकवटल्याचे चित्र आहे.भाजप नेतृत्वाच्या निर्णयाविरोधातच 'या' कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत नितेश राणेंच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत नितेश राणेंचे काम करणार नसल्याची भूमिका या जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली आहे. खरं तर गेल्या पाच वर्षांत नितेश राणेंनी कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांनी जोडलेला मतदारसंघ पिंजून काढला आहे. या तिन्ही तालुक्यांतील गावागावात भेटीगाठी घेऊन त्यांनी जनतेच्या विकासाची कामं केली आहे, मग स्वखर्चातून दिलेल्या बोअरवेल असो किंवा रस्त्यांसाठी निधी, अशी कामं करून अनेक गावांमध्ये त्यांनी जनतेचा आशीर्वाद मिळवलेला आहे. तसेच त्यांच्या विरोधात कणकवली मतदारसंघात म्हणावा तसा तगडा उमेदवार नाही. संदेश पारकर असो किंवा अतुल रावराणे यांचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. कणकवली तालुका सोडल्यास इतर दोन तालुक्यांत त्यांनाही फारसा जनाधार नाही.

राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा तळकोकणात पसरलेला आहे. सिंधुदुर्गातल्या अनेक ग्रामपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सत्ता आहे. नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष भाजपामध्ये विलीन केल्यानंतर ती सर्व ताकद भाजपाला मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच कोकणातील भाजपाचं वजन वाढणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे भाजपामध्ये जाणार अशा चर्चा आहेत. नारायण राणेंना पक्षात घेऊन भाजपा त्यांचा शिवसेनेविरोधात अस्त्रासारखाच वापर करणार आहे. भाजपानं राज्यभरात अनेक ठिकाणी ताकद वाढवली असली तरी कोकणात भाजपाला शिवसेनेमुळे ताकद वाढवता आलेली नाही. कोकणात होऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी भाजपाला तिथे आपले आमदार हवे आहेत, प्रत्येक वेळी शिवसेनेच्या दबावापुढे झुकणं भाजपाच्या फारसं पचनी पडत नाही. परंतु अपरिहार्यता म्हणून शिवसेनेबरोबर युती करून राज्यातील सत्तेचा गाडा भाजपाला हाकावा लागतो आहे. नितेश राणेंना भाजपाकडून मिळालेली उमेदवारी शिवसेनेलाही आवडलेली नाही. त्यातच राणेंचे एकेकाळचे जुने सहकारी असलेले सतीश सावंतही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी मातोश्रीचे उंबरे झिजवत उमेदवारी मिळवलेली आहे.
शिवसेनेकडून कणकवली मतदारसंघातून इच्छुक असलेल्या सतीश सावंत यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं राज्यभरात हा पॅटर्न राबवला जाण्याची भीती आहे. त्यामुळे आता भाजपाही शिवसेनेच्या विद्यमान आमदार आणि वजनदार नेत्यांविरोधात उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही, एकंदरीतच सतीश सावंतांना एबी फॉर्म दिल्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात शिवसेनेनं नितेश राणेंच्या विरोधात उमेदवार दिल्यानं युती फक्त कागदावरच शिल्लक राहिल्याचं चित्र निर्माण झालं आहे, त्यामुळे कणकवलीचा गड नितेश राणे राखतात की शिवसेना हा मतदारसंघ त्यांच्याकडून हिसकावून घेते हे निकालानंतरच समजणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे kankavli-acकणकवली