शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

चंद्रभागेतीरी कार्यक्रम नाहीच - हायकोर्ट

By admin | Published: March 07, 2015 1:24 AM

चंद्रभागेच्या तीरी कोणतेही कार्यक्रम घेण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा परवानगी नाकारली. नदीपात्रात बांधकाम करण्यास व इतर कोणताही विधी उरकण्यास न्यायालयाने गेल्या वर्षी निर्बंध आणले होते.

मुंबई : चंद्रभागेच्या तीरी कोणतेही कार्यक्रम घेण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा परवानगी नाकारली. नदीपात्रात बांधकाम करण्यास व इतर कोणताही विधी उरकण्यास न्यायालयाने गेल्या वर्षी निर्बंध आणले होते. मात्र धार्मिक विधी करणे हा आमचा मूलभूत अधिकार असल्याने चंद्रभागेच्या तीरी कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज वारकऱ्यांनी न्यायालयात केला होता.ही मागणी फेटाळताना न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने वारकऱ्यांचे व सरकारचे चांगलेच कान उपटले. धार्मिक विधी करणे वारकऱ्यांचा मूलभूत अधिकार असल्यास प्रदूषणविरहित शहर असणे, हाही नागरिकांचा मूलभूत अधिकारच आहे. तेव्हा नदीपात्र दूषित होणे, हे गैर असल्याने चंद्रभागेच्या तीरी कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच वेळोवेळी आदेश देऊन सरकार पंढरपुरात पुरेसे शौचालय उभारत नाही. त्यामुळे मानवाला मानवाची विष्ठा उचलावी लागते. सरकारचे हे वर्तन अशोभनीय आहे. त्यामुळे सरकारनेही येथे अधिकाधिक शौचालये उभारावीत, असे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले. पंढरपूरमध्ये विष्ठा उचलावी लागणे, हे अमानवीय असून याला निर्बंध घालावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका एका सामाजिक संघटनेने दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिले. (प्रतिनिधी)