शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

'ना तक्रार, ना फेरमतमोजणीची मागणी'; मारकरवाडी EVM प्रकरणावर निवडणूक आयोगाने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:04 IST

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव इथल्या ग्रामस्थांनी मंजूर केला होता.

Marakadwadi News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनीही ईव्हीएम मशीनबद्दल आक्षेप घेत बॅलेट पेपर म्हणजे मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. तशी तयारीही ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. पण, प्रशासनाने ही निवडणूक रद्द केली. या प्रकरणावर आता निवडणूक आयोगाकडून खुलासा करण्यात आला आहे. 

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकरवाडीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रितीनेच पूर्ण झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी म्हटले आहे.

भांगळालकर यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल काय सांगितलं?

"मारकडवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक ९६, ९७ आणि ९८ अशी तीन केंद्रे येतात. या तीनही मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे 'पोलिंग एजंट' उपस्थित होते आणि त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही", असे भांगळालकर यांनी सांगितले. 

"मतमोजणीच्या वेळी देखील उमेदवारांचे 'काउंटिंग एजंट उपस्थित होते. त्यांच्याकडूनही मतमोजणी दरम्यान किवा नंतरही कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही. तसेच फेरमतमोजणीची कोणतीही मागणी झाली नाही. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पारदर्शकपणे पार पडल्यानंतरच निकाल घोषित झाला आहे", असे निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी सांगितले. 

उमेदवारांच्या उपस्थितीत मतदान चाचणी

निवडणूक अधिकारी भांगळालकर म्हणाल्या, "निवडणुकीशी संबंधित प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींना सहभागासाठी नियमानुसार वेळोवेळी कळवले गेले होते. यानुसार उमेदवाराचे प्रतिनिधि निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागीसुद्धा झाले होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकीपूर्वी आणि मतदानाच्या दिवशी मतदानापूर्वी चाचणी मतदानही घेतले गेले, मतदानयंत्रांच्या फर्स्ट लेवल चेक (FLC) आणि कामिशनिंग ह्या टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चाचणी मतदान घेतले आहे."

"मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान यंत्रावर ५० मताची चाचणी घेतली गेली. या कोणत्याही टप्प्यावर संबंधितांकडून कोणत्याही तक्रारी वा आक्षेप नोंदवले गेलेले नाहीत. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्रक्रिया पूर्ण केली आहे. एकंदर मतदान, मतमोजणी आणि निकाल प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा विसंगती आढळली नाही", अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024malshiras-acमाळशिरसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग