शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

निधीचे मानापमान नको

By admin | Published: November 05, 2016 3:34 AM

डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ५० लाखांच्या निधीला २७ गावांच्या राजकारणाचा फटका

मुरलीधर भवार,

डोंबिवली- डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ५० लाखांच्या निधीला २७ गावांच्या राजकारणाचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागल्याने हा निधी मानापमानात अडकवू नका, अशी भूमिका विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे. आयोजक आगरी युथ फोरमला हा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही हे संमेलन शहराचे असावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यात सर्वांचा यथोचित सन्मान व्हावा, असे मत मांडत संमेलनाला सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी तर दोन पावले पुढे जात या संमेलनाला पालिकेने दोन कोटी रूपये द्यावेत, अशी भूमिका घेतली. या विषयावर प्रतिक्रियेसाठी स्वागताध्यक्ष आणि आयोजक आगरी युथ फोरमच्या प्रतिनिधींशी संपर्काचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. २७ गावांतील संघर्ष समितीच्या नेत्यांनीही गावांचे राजकारण आणि संमेलनाच्या निधीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.>अद्याप ठरावच नाही!संमेलनासाठी महापालिकेने ५० लाखांची तरतूद केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात या तरतुदीचा ठराव अद्याप महासभेत मंजूर झालेला नाही. येत्या महासभेत हा ठराव मंजूर करु, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. सांस्कृतिक कार्यासाठी महापालिकेने २०१२-१३ या वर्षी १० लाख ४२ हजार, २०१३-१४ मध्ये सात लाख ६२ हजार, २०१५-१६ ला १२ लाख १५ हजारांची तरतूद केली होती, तर २०१४-१५ साली अर्थसंकल्पात सांस्कृतिक कार्यासाठी एका रूपयाचीही तरतूद नव्हती. यावरुन पालिकेची सांस्कृतिक कार्याविषयीची अनास्था दिसून येते. यंदाच्या वर्षी ५० लाखांची तरतूद करण्यात आली. त्या व्यक्तिरिक्त कल्याण व डोंबिवलीतील सांगीतिक कार्यक्रमासाठी प्रत्येकी १० लाखांची तरतूद आहे. त्यापैकी ५०लाख संमेलनासाठी आहेत. २०१२ सालापासून करण्यात आलेली तरतूद प्रत्यक्षात ठराव रुपाने मंजूर होऊन संस्थांना वितरित झाली की नाही. प्रत्यक्षात त्याच कामावर खर्च झाली का, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही. >निधीवरून मानापमान नकोच : हळबेसंमेलन डोंबिवलीला होत आहे. ही बाबच मूळात गौरवास्पद आहे. महापालिकेने ठाण्याच्या साहित्य संमेलनाला २५ लाखाचा निधी दिला होता. त्यावेळी मानापमानाचा मुद्दा आला नाही. तर मग तो आताही येता कामा नये. पक्षाला व नेत्यांना विचारात घेतले नाही, या कारणावरुन निधी अडवून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. तरतूद करण्यात आलेला निधी संमेलनाला दिला गेला पाहिजे. संंमेलनासाठी राजकारण बाजू ठेवले गेले पाहिजे, असे स्पष्ट मत मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी मांडले.>यथोचित सन्मान व्हावा : महापौरसाहित्य संमेलन ही शहरासाठी गौरवास्पद बाब असली तरी साहित्य संमेलनात सर्वांचा यथोचित सन्मान व्हावा. हे संमेलन शहराचे वाटावे; तर निधी काय सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका आाहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. संंमेलनासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद केली आहे. संमेलन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. अध्यक्षपदाच्या घडामोडी सुरु आहेत, तर काही बाकी आहेत. त्यामुळे हा निधी देण्याचा ठराव अद्याप केलेला नसला, तरी तो केला जाईल. आगरी यूथ फोरमने संमेलनात सगळ््यांचा यथोचित सन्मान करावा. संमेलन हे शहराचे वाटले पाहिजे, तरच त्याला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. दोन कोटी द्या : भोईरविरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी सांगितले की, डोंबिवलीत संंमेलन होत आहे ही मानाची बाब आहे. महापालिकेने ५० लाख रुपयांचा निधी ठेवला. ठाण्यातील संमेलनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने २५ लाख रुपयांचा निधी दिला होता. कल्याण डोंबिवली महापालिके इतर महापालिकेस २५ लाख रुपये देते. आपल्या शहरात होत असताना केवळ ५० लाख रुपयांची तरतूद करते. महापालिकेचा वार्षिक अर्थ संकल्प २ हजार कोटी रुपयांचा आहे. केलेली तरतूद पाहता एकूण अर्थ संकल्पाच्या केवळ अर्धा टक्केच तरतूद केली आहे. वास्तविक पाहता संमेलनासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.>सरमिसळ नको : दामले२७ गावांचा मुद्दा वेगळा आहे. आगरी यूथ फोरमने त्याची सरमिसळ संमेलनाशी करु नये, गावांसाठी पालिकेचा निधी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निषेध करणे कितपत योग्य आहे. शहरात संमेलन आहे. त्याला ५० लाखांचा निधी दिला जाईल. त्याला भाजपचा विरोध असण्याचे कारण नाही. निधीचा ठराव लवकर मंजूर व्हावा, यासाठी येत्या महासभेत घेतला जाईल, असे भाजपा नेते राहूल दामले म्हणाले.