शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

नो लायसन्स नो पार्किंग

By admin | Published: August 13, 2014 12:55 AM

जीवघेणे अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखेने विविध योजना हाती घेतल्या आहेत. शाळा-महाविद्यालयात जनजागरण सभा घेतल्या जात आहेत. ‘नो लायसन्स, नो पार्किंग’ ही योजनासुद्धा सुरू होणार आहे.

कोल्हापूर : शहरात ‘आयआरबी’ने केलेल्या ४९.९९ किलोमीटर रस्त्यांचे मूल्यांकन करणाऱ्या समितीची आज, मंगळवारी मुंबईत बैठक झाली. रस्ते विकास महामंडळाने नेमलेल्या प्रा. कृष्णा राव यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीने अहवालात काही त्रुटी सुचविल्या आहेत. त्या दूर करून अहवालाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा गुरुवारी (दि. १४) बैठक घेण्यात येणार आहे. रस्ते प्रकल्पाची मूळ किंमत ठरविणारा हा अहवाल येत्या आठवड्यात शासनाला सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरातील रस्ते तपासणीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतेच पूर्ण केले. मंडळाने चार अभियंत्यांच्या पथकाद्वारे हे काम पूर्ण के ले असून, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने दोनवेळा कोल्हापूरला भेट देऊन या कामाचा आढावा घेतला होता. या अहवालाच्या आधारे समिती ‘आयआरबी’ कंपनीशी करारानुसार ठरलेल्या कामापैकी झालेल्या कामाची पडताळणी करून अंतिम अहवाल सादर करणार आहे.मंडळाने १० जुलैपासून २१ जुलैपर्यंत ‘रोड लेव्हल व बिटल्स सर्व्हे’ (सर्वंकष सर्वेक्षण)द्वारे संपूर्ण प्रकल्पाचा अहवाल पूर्ण केला. यामध्ये पदपथ, रस्त्यांची उंची (प्लिंथ लेव्हल), डांबरी व सिमेंटच्या रस्त्याची समानता, दोन्ही बाजूंची रुंदी, दर्जा, आदींची तपासणी स्थापत्य शास्त्राच्या निकषानुसार करण्यात आली. समितीने आजच्या बैठकीत सर्व अहवालाचा तपशीलवार आढावा घेतला. समितीला निदर्शनास आलेल्या त्रुटी सुधारून पुन्हा गुरुवारपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अहवालाचा अभ्यास करून समिती ‘आयआरबी’ने केलेल्या कामाचे मूल्यांकन निश्चित करणार आहे. तसेच शिल्लक राहिलेल्या कामाची यादी करून त्याची किंमत ठरविली जाणार आहे. ‘आयआरबी’ व महापालिकेने परस्परांविरुद्ध उपस्थित केलेल्या प्रलंबित मुद्द्यांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीच्या अहवालाचा फायदा राज्य शासन व न्यायालयीन कामकाजात होणार आहे. हा अहवाल पुढील आठवड्यात राज्य शासनास सादर केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी टोलबाबत ठोस निर्णय घेण्याची तयारी राज्य शासनाने केली असून, अहवालानंतरच कोल्हापूरच्या टोलचे भवितव्य ठरणार आहे. (प्रतिनिधी)