शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

यापुढे दहावीत एकही विद्यार्थी होणार नाही नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 7:50 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा या पुढील काळात गुणपत्रिकेवर वापरला जाणार नाही.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 30 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील नापास शेरा या पुढील काळात गुणपत्रिकेवर वापरला जाणार नाही. राज्याच्या शिक्षण विभागाने या संदर्भात निर्णय घेतला असून राज्य मंडळाकडून  निर्णयाची अंमलबजावणी जुलै-आॅगस्ट 2016 च्या परीक्षेपासून तात्काळ केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, या उद्देशाने राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची जुलै-आॅगस्ट महिन्यातच पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थी दहावीत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीचे मार्ग उपलब्ध होत नव्हते. परिणामी विद्यार्थ्याच्या मानसिक व शारीरिक स्वास्थावर विपरीत परिणाम होत होते. तसेच बरेच विद्यार्थी विघातक कामांकडे वळत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यातच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर केवळ पास किंवा नापास असे दोनच शेरे दिले जात होते. तसेच एक किंवा दोन विषयात नापास होणारे विद्यार्थी एटीकेटी सुविधेचा लाभ घेवून काही अटींवर अकरावीसाठी पात्र असतील असाही उल्लेख गुणपत्रिकेवर केला जात नव्हता. मात्र, जुलै-आॅगस्ट 2016 च्या पुरवणी परीक्षेच्या गुणपत्रिकेवर व फेब्रुवारी/मार्च 2017 पासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नापास शेरा वापरला जाणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, फेब्रुवारी/ मार्च 2017 पासून परीक्षेस प्रविष्ठ होणारे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झाल्यास गुणपत्रिकेवर नापास असा शेरा न देता ‘एटीकेटीसह अकरावी प्रवेशास पात्र’ असा शेरा दिला जाईल.  तीन किंवा त्या पेक्षा जास्त विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘पुरवणी परीक्षेस पात्र’असा शेरा तर सर्व विषयात उत्तीर्ण असल्यास उत्तीर्ण असाच शेरा राहिल. जुलै- आॅगस्ट 2016 च्या पुरवणी परीक्षेपासून तीन किंवा त्या पेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘ केवळ कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र’असा शेरा देण्यात येईल.
 
आॅनलाईन गुणपत्रिकेवर अकरावीत प्रवेश 
पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुळ गुणपत्रिका मिळण्यास उशीर होतो. मात्र, हा विलंब टाळण्यासाठी राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आॅनलाईन निकालाच्या प्रिट आऊटवरून विद्यार्थ्यांना तात्पूर्ता प्रवेश दिला जाईल. निकालाच्या प्रिंट आऊटवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेण्यात येईल.मात्र,एका महिन्याच्या आत मुळ गुणपत्रिका महाविद्यालयाकडे जमा करावी लागेल. प्रिंट आऊट व मुळगुणपत्रिकेत तफावत असल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करावा,असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.