शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

एकही मंत्री राजीनामा देणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Published: July 18, 2016 5:22 AM

‘झीरो टॉलरन्स फॉर करप्शन’ या तत्त्वानेच आपले सरकार चालले आहे.

मुंबई : ‘झीरो टॉलरन्स फॉर करप्शन’ या तत्त्वानेच आपले सरकार चालले आहे. केवळ विरोधक आरोप करतात म्हणून कोणीही मंत्री राजीनामा देणार नाही. उलट प्रत्येक आरोपाचे ठाम उत्तर दिले जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांची पाठराखण केली. पत्रपरिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, की मंत्री कुठे चुकले असतील तर विरोधकांनी दाखवून द्यावे. आम्ही चर्चेला तयार आहोत. त्यानी १५ वर्षांत काय काय केले ते लपून राहिलेले नाही. अर्थात त्यांनी काही केले म्हणून तसे करण्याचे लायसन्स आम्हाला मिळालेले नाही. शून्य भ्रष्टाचार हेच आमच्या कारभाराचे सूत्र असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. निर्णय शेतकरी हिताचाचबाजार समित्यांच्या बाहेर फळे, भाजीपाल्याच्या विक्रीस परवानगी देण्याच्या शेतकरी हिताच्या निर्णयावर शासन ठाम असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, की बहुतेक व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. इतरांशी चर्चा करण्यात येईल. सरकार व्यापाऱ्यांच्या नाही तर मक्तेदारीच्या विरोधात आहे. तूरडाळीच्या भावाबाबत ते म्हणाले, की किंमत नियंत्रण कायदा संमतीसाठी राज्याने केंद्राकडे पाठविला आहे. त्याला तत्काळ मान्यता देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी अलिकडच्या दिल्ली भेटीत आपल्याला दिले आहे. विषय नसलेला सैराट विरोधी पक्षकुठलेही मुद्दे; विषय नसलेला विरोधी पक्ष आपण यापूर्वी पाहिलेला नव्हता. विरोधक दुर्देवाने अजून सैराटमध्येच अडकले आहेत. सैराटपलिकडेदेखील जग आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काढला.नगरमधील तणावाबद्दल चर्चा करूनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन क्रुरपणे हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे. पण या घटनेवरून जिल्ह्यात जातीय तणावाचे प्रसंग उद्भवू नयेत यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि विविध संघटनांच्या नेत्यांशी आपण चर्चा करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)