शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

पाण्यावर कोणाचीही मक्तेदारी नाही

By admin | Published: April 03, 2016 3:51 AM

पाणी राज्य सरकारचे आहे. त्यामुळे पाण्यावर कोणाचीही मक्तेदारी चालू शकणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या भूमिकेवर अडून बसलेल्या

मुंबई : पाणी राज्य सरकारचे आहे. त्यामुळे पाण्यावर कोणाचीही मक्तेदारी चालू शकणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या भूमिकेवर अडून बसलेल्या नाशिक-नगरकरांना सुनावले.मराठवाड्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने गोदावरी- मराठवाडा पाटबंधारे विकास प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) जायकवाडी धरणात १२. ६४ टीमएसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. जीएमआयडीसीच्या या निर्णयाला नाशिक-नगरमधील संजीवनी सहकारी साखर कारखाना, डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान व अन्य काही संस्थांनी आणि स्थानिकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तर मराठवाड्यातील काही संस्थांनी व स्थानिकांनी सरकारच्या समर्थनार्थ अनेक याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. शनिवारच्या सुनावणीवेळी नाशिक-नगरच्या साखर कारखान्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ‘महाराष्ट्राचे पाणी आंध ्रप्रदेशला जाऊ नये, यासाठी जायकवाडी धरण बांधण्यात आले. या धरणाच्या पाठच्या बाजूला साठत असलेले पाणी येथील गावकरी उपसतात. त्यामुळे धरणात पाणी पोहचतच नाही. त्याचा भुर्दंड नाशिक-नगरकरांना भोगावा लागतो. दर वेळी मराठवाड्यासाठी नाशिक-नगरकरांच्या हिस्स्याचे पाणी द्यावे लागते. नाशिक- नगरमधील धरणे येथील स्थानिकांसाठी आहेत. त्यामुळे आधी नाशिक - नगरकरांच्या गरजा भागवण्यात याव्यात. ही धरणे आमची आहेत,’ असा युक्तिवाद नाशिक - नगरकरांच्या वकिलांनी खंडपीठापुढे केला.त्यावर उच्च न्यायालयाने साखर कारखान्यांनी याचिका का दाखल केल्या? असा प्रश्न करत साखर कारखान्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘कारखान्याचे सदस्य शेतकरी आहेत. आम्ही आमच्या सदस्यांचे हित पाहतो. या हिताआड काही येत असेल तर आम्हाला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे,’ असाही युक्तिवाद कारखान्यांतर्फे करण्यात आले. (प्रतिनिधी) शनिवारी नाशिक- नगरकरांचा युक्तिवाद संपला आहे. सरकारला अद्याप भूमिका मांडायची संधी मिळालेली नाही. १६ एप्रिल रोजी राज्य सरकार आपली बाजू खंडपीठापुढे मांडेल. त्यामुळे याच दिवशी सर्व पक्ष कार आणि प्रतिवाद्यांची बाजू मांडून पूर्ण होईल व याच दिवशी निकाल राखून ठेवण्यात येईल, असे संकेत उच्च न्यायालयाने दिले आहेत.