संगमनेर (अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणांमधून यापुढे जायकवाडीला आणखी पाणी न सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही धरणांच्या पाण्याबाबत दाखल याचिकांवर तीन आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश जलसंपत्ती प्राधिकरणास दिले होते.भंडारदरा व निळवंडे धरणांमधून जायकवाडीला अधिक पाणी सोडू नये, यासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात साखर कारखाना व हरिश्चंद्र पाणी पुरवठा फेडरेशनने याचिका केली होती. त्यानुसार २४ फेबु्रवारीला उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात सुनावणी झाली. १० मार्चच्या अंतिम सुनावणी दरम्यान जलसंपत्ती प्राधिकरणाने दोन्ही धरणांतून जायकवाडीला अधिक पाणी न सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र न्यायालयास दिले. (प्रतिनिधी)
अहमदनगरचे आणखी पाणी जायकवाडीला सोडणार नाही!
By admin | Published: March 12, 2015 1:44 AM