शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

नोटाबंदी देशातील सर्वात मोठा घोटाळा

By admin | Published: December 30, 2016 9:03 PM

नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले. तरीही परिस्थिती सुधारलेली नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला आहे.  बँका आणि एटीएमसमोरील लोकांच्या रांगा कायम असून, व्यापार ठप्प झाला आहे. या निर्णयाने देशातील कोणताही काळा पैसा बाहेर निघालेला नाही. उलट हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला. ते शुक्रवारी रविभवन येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पुनिया पुढे म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्याच दिवशी कोलकाता येथील एका बँकेतील भाजपाच्या खात्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमध्ये तीन कोटी रुपये जमा झाले. तसेच मागील १ मार्च २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान भाजपा आणि आरएसएसने देशभरातील आपल्या खात्यांमध्ये किती रक्कम जमा केली, याची वारंवार माहिती मागूनसुद्धा ती दिली गेलेली नाही. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी भाजपा व आरएसएसने देशभरात कोट्यवधीच्या संपत्तीची खरेदी केली आहे. भाजपाला नोटाबंदीच्या निर्णयाची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच त्यांनी निर्णयापूर्वी काळ्या पैशातून संपत्ती खरेदी करून तो पैसा पांढरा केला आहे, असाही पुनिया यांनी गंभीर आरोप केला.त्यामुळे सरकारने बँक खात्यातील पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध हटवून प्रत्येकाच्या खात्यातील जमा रकमेवर १८ टक्के व्याज देण्यात यावे, तसेच बीपीएल कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर प्रत्येकी २५ हजार रुपये जमा करण्यात यावेत. तसेच लहान दुकानदार आणि उद्योगांना प्राप्तिकर आणि विक्री करात ५० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. शिवाय नोटाबंदीमुळे सध्या देशातील लोकांना होत असलेला त्रास जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा या निर्णयाविरुद्घ संघर्ष सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.