शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

पर्युषण काळात मांसविक्रीस बंदी नाही - सर्वोच्च न्यायालय

By admin | Published: September 17, 2015 1:49 PM

धार्मिक कारणांसाठी मांसविक्रीवर बंदी घालण्यासारखे निर्णय लोकांवर लादता येणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयानेही पर्युषण पर्वामध्ये

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - धार्मिक कारणांसाठी मांसविक्रीवर बंदी घालण्यासारखे निर्णय लोकांवर लादता येणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयानेही पर्युषण पर्वामध्ये मांसविक्री बंदी रद्द करणारा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. जैन धर्मीयांच्या पर्युषण या पवित्र काळात मांसविक्रीस बंदी घालण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव होता. परंतु उच्च न्यायालयाने अशी बंदी घालता येणार नाही असा निकास दिला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने कबीराच्या दोह्याचा दाखला देत, जे अशा बंदीला विरोध करत आहेत त्यांच्याप्रतीदेखील सरकारने संवेदनशील असले पाहिजे असे सांगितले आणि लोकांवर अशा बंदी लादता येणार नाहीत हे स्पष्ट केले.
अहिंसा हे भारतीय घटनेचे मुलभूत तत्व आहे आणि यामध्ये प्राण्यांची हिंसादेखील येते. प्राण्यांनाही सहानुभूतीची वागणूक दिली पाहिजे हे तत्व घटनेला अभिप्रेत असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. अर्थात, पुढे जात केवळ धार्मिर पावित्र्याच्या कालखंडातच का, कायमसाठी प्राण्यांप्रती करूणा व दयाभाव का नको असा सवालही पुढे त्यांनी विचारला. तसेच, अशाप्रकारच्या बंदी लोकांवर जबरदस्तीने न लादता सुधारणांच्या माध्यमांतून आणि व्यापक स्तरावर कार्य करून समाजमन घडवणं महत्त्वाचं असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं.