शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा 

By विजय दर्डा | Updated: February 24, 2025 10:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप हा समारोप ...

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप हा समारोप नसून मराठी भाषा संवर्धन करण्याची सुरुवात असल्याचे मत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी समारंभात व्यक्त केले. मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी भाषेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सरकारने तातडीने पाउले उचलण्याची गरज आहे. मराठी माणूस पराक्रमी आणि कर्तबगार आहे. महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे. त्यामुळे मराठी माणसाने महाराष्ट्र धर्म जपणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

लोकमत वृत्तपत्राचे तीन कोटी वाचक आहेत. लोकमत दिल्लीतूनही प्रकाशित होतो आहे. यास वाचकांचा पाठिंबा मिळत असल्याचा आनंद आहे. याचा अर्थ लोक मराठी वाचतात. मात्र, पुढच्या पिढ्यांनी मराठी बोलावी आणि त्यांचे मराठीशी नाते घट्ट व्हावे यासाठी आपण काय करीत आहोत? हा खरा मुद्या आहे. ३६ जिल्ह्यांच्या महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत ललित साहित्याचे एकही दुकान असू नये? विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यात पुस्तकाचे एकही दुकान नाही. ग्रंथालये आधीच कमी आहेत. असतील तर अनुदान कमी आहे. ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. मग वाचन संस्कृती कशी वाढणार? याकडे डॉ. दर्डा यांनी लक्ष वेधले.

आतापर्यंत तीन, चार महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे याचे उत्तर देवू शकतील, असे डॉ. दर्डा यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

मराठी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळत नाही शाळा आणि भाषा या दोन्ही गोष्टी शिंदे साहेबांकडे आहेत आणि पैसे द्यायला अजितदादा तयार आहेत. यासाठी शासनाने आणखी काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळत नाही. याउलट इंग्रजी बोलणाऱ्या तरूणाला लवकर नोकरी मिळते? असा मुद्दा डॉ. दर्डा यांनी उपस्थित करताच सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला.

हे संमेलन ऐतिहासिकपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम या संमेलनाला केले आहे. यामुळे मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक आहे. मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे. यासाठी संजय नहार यांचे कौतुक करायला हवे. 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ