शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आता भारत जोडो साहित्य दिंडी; राहुल गांधींच्या यात्रेला १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांचा पाठिंबा 

By भारत दाढेल | Updated: November 9, 2022 08:00 IST

अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू भ्रम निर्माण करून नवे आदर्श निर्माण केले जात आहेत.

नांदेड :

अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू भ्रम निर्माण करून नवे आदर्श निर्माण केले जात आहेत. या विकृतीकरणाचा संसर्ग वाडी, वस्ती, तांडे, खेड्यापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर लेखक, कवी, चित्रकार, कलावंत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. सहिष्णू भारत घडविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने साहित्यिक मंडळी पुढे आली असून, त्यांनी ‘भारत जोडो साहित्य दिंडी’ स्थापन केली आहे.  

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेला राज्यातील १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांनी पाठिंबा दिला असून यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक, कलावंत नांदेड येथे दाखल झाले आहेत. या दिंडीचे निमंत्रक प्रा. डॉ. दत्ता भगत, डॉ. जगदीश कदम, प्रा. श्रीकांत देशमुख,  डॉ. विशाल पतंगे, विजय वाकोडे  हे आहेत. या समितीच्या वतीने मंगळवारी स्थानिक साहित्यिकांची बैठक घेण्यात आली.

या साहित्यिकांचा पाठिंबा  वसंत आबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, रा.रं. बोराडे, कौतिकराव ठाले पाटील, अनुराधा पाटील, फ.मुं. शिंदे, डॉ. लीला शिंदे, संदेश भंडारे, प्रा. राजन गवस, सुमती लांडे, प्रवीण बांदेकर, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, प्रा. सदानंद देशमुख, भु.द. वाडीकर, कवी पी. विठ्ठल, डॉ. शेषराव मोहिते, डॉ. नागोराव कुंभार, लोकनाथ यशवंत, डॉ. श्रीराम गव्हाणे, शिवा अंबुलगेकर, डॉ. उत्तम सावंत, प्रा. डॉ. मारोती कसाब, डॉ. रामचंद्र काळुंखे आदी यात्रेत सहभागी होतील.  

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. कळमनुरी येथे १२ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भेट घेऊन साहित्यिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, तसेच, त्यांना निवेदन देणार आहेत.   - डॉ. जगदीश कदम, समन्वयक

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी