शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

आता भारत जोडो साहित्य दिंडी; राहुल गांधींच्या यात्रेला १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांचा पाठिंबा 

By भारत दाढेल | Published: November 09, 2022 7:58 AM

अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू भ्रम निर्माण करून नवे आदर्श निर्माण केले जात आहेत.

नांदेड :

अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू भ्रम निर्माण करून नवे आदर्श निर्माण केले जात आहेत. या विकृतीकरणाचा संसर्ग वाडी, वस्ती, तांडे, खेड्यापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर लेखक, कवी, चित्रकार, कलावंत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. सहिष्णू भारत घडविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने साहित्यिक मंडळी पुढे आली असून, त्यांनी ‘भारत जोडो साहित्य दिंडी’ स्थापन केली आहे.  

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेला राज्यातील १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांनी पाठिंबा दिला असून यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक, कलावंत नांदेड येथे दाखल झाले आहेत. या दिंडीचे निमंत्रक प्रा. डॉ. दत्ता भगत, डॉ. जगदीश कदम, प्रा. श्रीकांत देशमुख,  डॉ. विशाल पतंगे, विजय वाकोडे  हे आहेत. या समितीच्या वतीने मंगळवारी स्थानिक साहित्यिकांची बैठक घेण्यात आली.

या साहित्यिकांचा पाठिंबा  वसंत आबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, रा.रं. बोराडे, कौतिकराव ठाले पाटील, अनुराधा पाटील, फ.मुं. शिंदे, डॉ. लीला शिंदे, संदेश भंडारे, प्रा. राजन गवस, सुमती लांडे, प्रवीण बांदेकर, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, प्रा. सदानंद देशमुख, भु.द. वाडीकर, कवी पी. विठ्ठल, डॉ. शेषराव मोहिते, डॉ. नागोराव कुंभार, लोकनाथ यशवंत, डॉ. श्रीराम गव्हाणे, शिवा अंबुलगेकर, डॉ. उत्तम सावंत, प्रा. डॉ. मारोती कसाब, डॉ. रामचंद्र काळुंखे आदी यात्रेत सहभागी होतील.  

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. कळमनुरी येथे १२ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भेट घेऊन साहित्यिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, तसेच, त्यांना निवेदन देणार आहेत.   - डॉ. जगदीश कदम, समन्वयक

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी