शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
2
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
3
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
4
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
5
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
6
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
7
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
8
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
9
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
10
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
12
श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; अपार्टमेंटची किंमत ऐकून बसेल धक्का
13
१० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 
14
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
15
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
16
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
17
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
18
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
19
धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ...
20
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव

आता केंद्राने राम मंदिरासाठी कायदा करावा - मा.गो.वैद्य

By admin | Published: March 11, 2017 10:08 PM

राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेशी जुळलेला मुद्दा आहे. उत्तरप्रदेशातील जनतेलादखेली राममंदिर हवे आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11 : राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आस्थेशी जुळलेला मुद्दा आहे. उत्तरप्रदेशातील जनतेलादखेली राममंदिर हवे आहे. निकालांतून त्यांचा पाठिंबा स्पष्ट झालेला आहे. आता केंद्र सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी केले. उत्तरप्रदेश निवडणूकांच्या निकालांनंतर वैद्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.अयोध्येत ज्या ठिकाणी राम मंदिर होते ते पाडून त्याठिकाणी राम मंदिर बांधण्यात आले असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात अद्याप निर्णय दिलेला नाही. या परिस्थितीत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा असे आवाहन वैद्य यांनी केले.गोव्यातील पिछाडीला वेलिंगकर जबाबदारगोव्याच्या निकालात भाजपाची पिछेहाट झाली आहे. संघाचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर हे यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यांनी राजकीय महत्वाकांक्षा बाळगत केलेल्या बंडखोरीमुळे भाजपाला फटका बसला, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसने मोठे होणे आवश्यकलोकशाही पद्धतीत २ मोठे पक्ष देशात असणे आवश्यक आहे. आजच्या घडीला कॉंग्रेस माघारला आहे. सुदृढ लोकशाहीसाठी कॉंग्रेसने मोठे होणे आवश्यक आहे. यासाठी कॉंग्रेसने गांधी घराण्याच्या परिघातून बाहेर निघण्याची आवश्यकता आहे, असे वैद्य यांनी रोखठोक प्रतिपादन केले.