शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! - उद्धव ठाकरे

By admin | Published: June 09, 2017 7:50 AM

देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे.  राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालकांचे मन वळवायलाच हवे!! असं स्पष्ट मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आजपर्यंत सेक्युलर सरकारांचे ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात बसले. मग आता राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम हे रेंगाळलेले देशहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी हिंदुत्वाचा ‘रबर स्टॅम्प’ राष्ट्रपती भवनात विराजमान झाला तर बिघडले कुठे? कारण हिंदू राष्ट्रावर ‘मोहोर’ उठवणारा राष्ट्रपतीच आता देशाला हवा आहे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडलं आहे. 
 
हिंदुस्थानच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे.   निवडणुकीचे जे वेळापत्रक जाहीर झाले आहे त्यानुसार १४ जुलै रोजी मतदान होईल व २० जुलै रोजी राष्ट्रपती नामक नव्या ‘रबर स्टॅम्प’ची घोषणा केली जाईल. सध्याची आकडेमोड पाहता पंतप्रधान मोदी यांच्याच पसंतीची व्यक्ती ही राष्ट्रपतीपदी विराजमान होईल, याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
राष्ट्रपती कितीही अनुभवी असले तरी मार्गदर्शन करण्याशिवाय त्यांच्या हातात तसे दुसरे काहीच नसते. त्यामुळे कश्मीर प्रश्न, बेरोजगारी, शेतकऱयांच्या आत्महत्या आदी विषयांवर ते फक्त मार्गदर्शनच करू शकतात. राष्ट्रपती हे तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात, पण म्हणून कश्मीरप्रश्नी ते सेनापतींना युद्धाचे आदेश देऊ शकत नाहीत. अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्रपती थेट जनतेतून निवडून दिले जातात. त्यामुळे ते राष्ट्राचे खऱया अर्थाने कारभारी असतात. हिंदुस्थानी राष्ट्रपतींचे तसे नसते. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून ते विराजमान असले तरी बऱयाच अर्थाने ते शोभेचेच पद झाले आहे असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
राष्ट्रपती भवनात डॉ. अब्दुल कलाम किंवा प्रणव मुखर्जींसारखी व्यक्ती बसली की त्यातल्या त्यात त्या पदाची शान राहते, नाही तर राज्यकर्त्या पक्षास सोयीची असलेली व्यक्ती तेथे ब्रिटिशांच्या बग्गीतून थाटामाटात पाठवली जाते. हा एक थाटामाटाचा जंगी लग्नसोहळाच ठरतो. त्यामुळे येत्या २० जुलैला कुणाच्या डोक्यावर या वरातीचे बाशिंग बांधले जातेय तेच आता पाहायचे आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
राष्ट्रपती पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने अनेकांनी परस्पर मुंडावळय़ा आणि बाशिंगांची ऑर्डर दिली असली तरी पंतप्रधान मोदींच्या हाताने ज्यास मुंडावळय़ा बांधल्या जातील तोच नवरदेव ठरेल. हळूहळू रिंगण व रिंगणातील खेळाडूंची व्याप्ती वाढेल, पण आम्हाला विचाराल तर आम्ही आजही सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावावर ठाम आहोत असं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
 
देशाच्या राष्ट्रपती भवनात ‘जनतेचा’ माणूस व हिंदुत्ववादी विचारांचा माणूस हवा असेल तर सरसंघचालकांना राष्ट्रपती करून हिंदू राष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे. सरसंघचालकांचे मार्गदर्शन एरव्ही देशाला होतच असते, पण घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती पदावरील त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. सरसंघचालक राष्ट्रपती पदावर विराजमान होणे हा आतापर्यंत ज्या विचारांसाठी रा. स्व. संघासह आपण सर्वांनी संघर्ष केला त्या विचारांचा विजय ठरेल. सरसंघचालकांचे मन वळवायलाच हवे!! अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.