शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

आता राज्यातील सुरक्षारक्षकही विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात, संपाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 5:39 AM

अडचणीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्याची मागणी.

मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता राज्यातील सुरक्षारक्षकही विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.  विलीनीकरणाच्या मागणीसह इतर मागण्या मान्य करा, अन्यथा संपावर जाऊ, असा इशारा सुरक्षा रक्षक संघटनेने दिला आहे. 

माय बळीराजा सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष गंगाधर वाघमारे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपासून अनेक संघटना सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी अहोरात्र झटत आहेत. तरी मंडळातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी काही देणे-घेणे नाही, असेच वागत आहेत. अडचणीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे. महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक यंत्रणा एकत्रित कराव्या, जेणेकरून शासनाचा अंकुश सर्व जागी राहील. 

‘प्रतीक्षा यादीतील सुरक्षा रक्षकांना नोकरी द्या’रायगड व पुणे जिल्ह्यात भरती करण्यात आली होती, तसेच इतर सर्व सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना आस्थापणेने बेरोजगार केले आहे. जे आता वेटिंग लिस्टवर आहेत अशा सुरक्षा रक्षकांना मंडळाने इएसआयसी कडील बेरोजगार भत्ता मिळवून द्यावा आणि तत्काळ नोकरी देण्यात यावी, अशी मागणी माय बळीराजा सुरक्षा रक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष  प्रसाद मोरे यांनी  केली.

महाराष्ट्र शासनात मंडळांचे विलीनीकरण होईपर्यंत मंडळाकडून गणवेश आणि इतर असेम्बली साहित्यासाठी निविदा काढण्यात येतात. त्या निविदा घेणाऱ्या कंपन्या सुरक्षा रक्षकांना उच्च दर्जाचे गणवेश, असेम्बली देण्यास असमर्थन दिसत असल्याने निविदा प्रक्रिया रद्द करून त्यावर लेव्हीमधील टक्केवारी प्रमाणे खर्च होणारी रक्कम सुरक्षा रक्षकांच्या बँक खात्यात जमा करावी. जो सुरक्षा रक्षक गणवेश आणि इतर गोष्टी नित्यनेमाने आणि व्यवस्थित परिधान करत नसेल त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून जनमाणसात मंडळाच्या सुरक्षा रक्षकांची प्रतिमा चांगली दिसेल आणि मंडळाकडे आस्थापना नोंदी वाढतील. - अभिलाष डावरे, संघटनेचे कार्याध्यक्ष.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र