शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

राज्यात आता ‘आनंदी आनंद’!

By admin | Published: June 03, 2017 5:39 AM

राज्यातील बळीराजा संपावर गेला असला, शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असली आणि कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अधिक

विशेष प्रतिनिधी/  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील बळीराजा संपावर गेला असला, शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असली आणि कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण अधिक असले, तरी राज्यातील जनता आनंदी राहावी, यासाठी सरकार आता स्वतंत्र आनंद विभाग स्थापन करणार असून, तशा हालचाली सुरू आहेत.भौतिक प्रगतीबरोबर मानसिक समाधान लाभणे तितकेच महत्त्वाचे असते. कोणतेही राष्ट्र असो की राज्य, संयुक्त राष्ट्र संघामार्फत त्या प्रदेशाच्या प्रगतीचे मूल्यमापन आता आनंद निर्देशांकानुसार केले जाते. नागरिकांचा आनंद हा केवळ भौतिक प्रगतीवर अवलंबून नसून त्यास सामाजिक, कौटुंबिक तसेच मानसिक आरोग्याचे परिमाण आवश्यक ठरते. याच्या माध्यमातून देशाची ओळख ही जागतिक पातळीवर अधिक आनंदी देश अशी होणे आवश्यक आहे. त्या साठीचाच एक भाग म्हणून राज्य शासन मदत व पुनर्वसन विभागांतर्गत आनंद विभाग स्थापन करणार आहे. त्या बाबतचा आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना आज करण्यात आली. मदत व पुनर्वसन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील. सामान्य प्रशासन विभाग, वित्त आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वा प्रधान सचिव, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान; मुंबई, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान; मुंबईचे प्रत्येकी एक सदस्य असतील. आनंद विभागासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, तसेच यंत्रणेबाबतचा आकृतिबंद ही समिती निश्चित करेल. या विभागासाठी लागणारा निधी आणि क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा या बाबत आवश्यक त्या शिफारशीदेखील समिती करेल. समिती तिच्या पहिल्या बैठकीपासून तीन महिन्यांच्या आत अहवाल देईल. ‘आनंद’ कसा मोजला जातो...संयुक्त राष्ट्र संघाने नुकताच २०१७ सालचा जागतिक आनंद अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार जगातील १५५ देशांमध्ये भारताचा १२२ वा क्रमांक आहे. मुळात आनंद ही संकल्पना अमूर्त स्वरूपाची असल्याने, त्यानुसार संपूर्ण देशाचे मानांकन ठरविणे ही अभिनव संकल्पना आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात आनंद या संकल्पनेचे गुणांकन ठेवण्यासाठी प्रशासन, संस्थात्मक रचना आणि नागरिकांच्या सामाजिक संस्था या प्रमुख घटकांचा विचार केला जातो. या घटकांच्या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या आनंदाचे परिमाण मोजून देशाचा आनंद निर्देशांक (हॅपिनेस इंडेक्स) ठरविला जातो. त्यावरून, ढोबळ राष्ट्रीय आनंद निर्देशांक मोजला जातो.