शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

राज्यात अब की बार महायुतीची सरकार

By admin | Published: August 10, 2014 9:56 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा शिवसेना - भाजपा महायुतीचा विजय होईल असे भाकीत एबीपी न्यू आणि नेल्सनने वर्तवले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १० - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा  शिवसेना - भाजपा महायुतीचा विजय होईल असे भाकीत एबीपी न्यू आणि नेल्सनने वर्तवले आहे. विशेष म्हणजे  महायुती किंवा स्वबळावर लढल्यास राज्यात सर्वाधिक जागा भाजपलाच मिळतील असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
एबीपी न्यूज आणि नेल्सनने जुलै ते ऑगस्ट याकालावधीत सुमारे २२ हजार सॅम्पल गोळा करुन विधानसभेसाठी जनमत जाणून घेतले. यानुसार राज्यातील २८८ जागांपैकी महायुतीला २१० आणि आघाडीला फक्त ५५ जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. महायुतीतील २१० पैकी १२२ जागांवर भाजप, ८२ जागांवर शिवसेना, रिपाई आणि स्वाभिमानी प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर आघाडीत काँग्रेसला ३२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २३ जागांवर विजय मिळेल असे सर्वेक्षणात म्हटले आहे. मनसेला यंदा ११ जागांवरच समाधान मानावे लागेल असे सांगितले जाते. 
----------
स्वबळावर लढल्यावरही भाजपचे पारडे जड
विधानसभेसाठी शिवसेना- भाजप-रिपाई- स्वाभिमानी यांची महायुती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती कायम असली तरी स्वबळावर लढल्यास भाजपचेच पारडे जड असल्याने सर्वेक्षणातून समोर येते. भाजपला ११२ जागा, शिवसेनेला ६२ जागा मिळतील असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तर काँग्रेसला ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ जागांवर विजय मिळेल असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.  मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेले १४५ चे मॅजिक फिगर गाठण्यात सर्व पक्ष अपयशी ठरतील हे स्पष्ट होते. . 
----------
पृथ्वीराज चव्हाण अव्वल
मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे अद्याप एकाही पक्षाने स्पष्ट केलेले नाही. मात्र एबीपी - नील्सनच्या सर्वेक्षणात मतदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वाधिक पसंती दिली आहे. चव्हाण यांना २१ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला. तर त्याखालोखाल उद्धव ठाकरे १८ टक्के, देवेंद्र फडणवीस १६ टक्के यांचा क्रमांक लागला आहे. तर राज ठाकरेंना ८ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर आहेत.