शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

कोरोना रुग्ण वाढत असल्याने कठोर निर्णय घ्यावे लागतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 05:53 IST

Deputy Chief Minister Ajit Pawar : नागरिकांनी शिस्त पाळली नाही तर पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबतची मानसिकता तयार ठेवावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.

औरंगाबाद : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत २० हजार २११ कोरोना रुग्ण आढळणे ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी शिस्त पाळली नाही तर पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबतची मानसिकता तयार ठेवावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना याबाबत सांगितले असून हे सगळे काळजीचे वातावरण आहे. जगात विविध देशांत दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करावे लागते आहे पण आपल्याला त्याचे गांभीर्य नाही. काही गोष्टींबाबत वेळेत निर्णय न घेतल्यास अडचणी वाढतील. काही लोक राजकारण करीत आहेत. शिवजयंती १९ फेब्रुवारीला असून जयंतीला बंधने कशाला आणता, अशी वक्तव्ये काही करीत आहेत. कोरोना वाढू नये यासाठी ही खबरदारी घेत आहोत. मागील वर्षभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे राजकारण करून भावनिक आधार घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असे आवाहन पवार यांनी केले.

धोक्याचा इशारा, हलगर्जी करू नकाविभागीय आयुक्तालया बैठकीनंतर उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील रुग्णवाढ गंभीर असून जानेवारी  आणि फेब्रुवारीत संख्या वाढली आहे. नाशिकला १४ फेब्रुवारीपर्यंत १४६३, औरंगाबादला ४२७, अमरावतीत २४२०, नागपूरला २६२८, वर्धा येथे ४६६ अशी रुग्णसंख्या वाढणे हा धोक्याचा इशारा आहे. याचा गंभीरतेने विचार करायला हवा. हलगर्जीपणा कुणीही करू नये.

कार्यक्रमांबाबत लवकरच निर्णय घेणारराजकीय कार्यक्रमांनाच जास्त गर्दी होत आहे, याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, हा मुद्दा बरोबर आहे. याला कुठेतरी ब्रेक लागावा यासाठी सर्व पक्षप्रमुखांना बसून सांगावे लागेल. राजकीय पक्षांना नियमावली नाही आणि इतर जयंती, पुण्यतिथींवर बंधने आणली, तर लोकांना मान्य होणार नाही. यासाठी मुंबईत राज्यप्रमुखांशी बोलून सरकार निर्णय घेईल.

आणखी १८-१९ लसी लवकरच - डॉ. हर्षवर्धनकोरोनाविरोधी आणखी १८ ते १९ लसी जवळपास तयार असून, त्यांच्या चाचण्या सुरू आहेत, अशी माहिती देतानाच, भारतातून २० ते २५ देशांना लसींची निर्यात करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिली. देशातील ५० वर्षे वयावरील लोकांना दोन ते तीन आठवड्यांत लस देणे सुरू होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

नियम पाळले नाहीतर पुन्हा लॉकडाऊन - टोपेविदर्भ, मुंबईत रुग्ण वाढत आहेत. जे अधिकारी ट्रॅकिंग, टेस्टिंगमध्ये लक्ष देत नाहीय, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. सध्या नियम पाळले जात नाहीये हे स्पष्ट दिसतेय. जनतेला त्रास होऊ नये म्हणून आपण निर्बंध उठवले. पाश्चिमात्य देशात पुन्हा लॉकडाऊन सुरू झालाय. नियम पाळले गेले नाही तर आपल्याकडेही लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

विषाणू काच, प्लास्टिकवर अधिक काळ जिवंतकोरोनाचा विषाणू हा कागद, कपड्यांपेक्षा काच, प्लॅस्टिक यांच्या पृष्ठभागावर अधिक काळ जिवंत राहातो, असे आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या पाहणीतून आढळून आले आहे. आयआयटी मुंबईतील संशोधक संघमित्र चॅटर्जी यांनी सांगितले की, रुग्णालये, कार्यालये येथे काच, स्टेनलेस स्टील, लॅमिनेटेड लाकूड यांनी बनविलेल्या फर्निचरवर सच्छिद्र पृष्ठभागाच्या गोष्टींचे आवरण घालावे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाला आणखी प्रतिबंध करता येईल.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस