शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

वाहनांची संख्या झाली कमी

By admin | Published: November 20, 2015 1:29 AM

दरवर्षी वाहनसंख्येत ५ टक्के वाढ होत असल्याचे गृहीत धरले असतानाही, पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या

पुणे : दरवर्षी वाहनसंख्येत ५ टक्के वाढ होत असल्याचे गृहीत धरले असतानाही, पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा घट झाली आहे! रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्वतंत्र एजन्सीमार्फत जे सर्वेक्षण केले, त्या आकडेवारीपेक्षाही निम्मीच वाहने रस्त्यारून धावत असल्याचे टोल आकारणी करणाऱ्या कंपनीच्या आकडेवारीवरून ही घट प्रकर्षाने जाणवते.एमएसआरडीसीने एजेएस स्केल इंटरनॅशनल या एजन्सीकडून जानेवारी आणि फेबु्रवारी २०१४ मध्ये सातारा-कोल्हापूर महामार्गावरील किणी आणि तासवडे या टोल नाक्यांवरून दररोज किती वाहने धावतात, याचा सर्वे करून घेतला होता़ त्यानुसार किणी टोल नाक्यावरून जानेवारी २०१४ मध्ये १९ हजार २७ तर, तासवडे टोलनाक्यावरून २२ हजार ३८ वाहने दररोज धावत असल्याचे दिसले. मात्र, टोलवसुली करणाऱ्या कन्सल्टिंग इंजिनियर्स ग्रुपने दिलेल्या आकडेवारीत, जानेवारीत किणी टोल नाक्यावरून १३ हजार ७९० वाहने, तर तासवडे टोल नाक्यावरून १४ हजार ८६६ वाहने धावल्याची नोंद आहे!टोलवसुलीचा करार करताना दरवर्षी ५ टक्के वाहनसंख्या वाढणार, असे गृहीत धरले आहे. मात्र, २०१४ मध्ये जितकी वाहने या रस्त्यावरून गेली, त्यात २०१५ मध्ये घट झाल्याचेही दाखविण्यात आले आहे. वाहने घटली कशी? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)१२ वर्षांत वाहनसंख्येत वाढच नाहीरस्ते विकास महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार, आॅक्टोबर २००३ मध्ये किणी टोल नाक्यावरून १० हजार ८६४ आणि तासवडे टोल नाक्यावरून ९ हजार ८८६ वाहने जात होती. मात्र, बारा वर्षांनंतरही, तसेच प्रमाण आज कंपनी दाखवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले, ‘एखाद्या महामार्गावरील वाहने १० वर्षांत कमी झाल्याचे जगात उदाहरण नाही़ टोल कंपन्यांनी दिलेली आकडेवारी आणि आपण करवून घेतलेल्या सर्वेची आकडेवारी तपासून पाहण्याची कोणतीही तसदी रस्ते विकास महामंडळ अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घेत नाही.