शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

पाण्याच्या समस्येला अधिकारीच जबाबदार

By admin | Published: April 08, 2017 4:39 AM

अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अंबरनाथमध्ये आल्या

अंबरनाथ : अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अंबरनाथमध्ये आल्या होत्या. अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची माहिती घेतली जात असतानाच अंबरनाथमधील काँग्रेस नगरसेवकांनी थेट कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात आल्याचे कळताच पाणीसमस्येने त्रस्त असलेल्या इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही प्राधिकरणाचे कार्यालय गाठले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीसमस्येसोबतच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणी येथील पाणीप्रकल्पाची माहिती घेण्यासाठी अधीक्षक अभियंता मनीषा पालांडे या अंबरनाथमध्ये आल्या होत्या. कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात यासंदर्भात बैठक सुरू होती. याच वेळी पाणीसमस्येची आणि दोन वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या योजनेची तक्रार करण्यासाठी नगरसेवक प्रदीप पाटील, उमेश पाटील, चरण रसाळ, विलास जोशी हे प्राधिकरणाच्या कार्यालयात आले होते. या वेळी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने या सर्व नगरसेवकांनी पालांडे यांची भेट घेत त्यांच्यापुढे तक्रार केली. वरिष्ठ अधिकारी आल्याचे कळताच पाणीपुरवठा सभापती रेश्मा गुडेकर आणि भाजपाचे नगरसेवक वसंत पाटील हेही अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले. या वेळी सर्व नगरसेवकांनी चिंचपाडा येथील पाण्याच्या टाकीची आणि नवीन भेंडीपाडा येथून येणाऱ्या जलवाहिनीच्या रखडलेल्या कामाची तक्रार पालांडे यांच्याकडे केली. दोन वर्षे हे काम रखडल्यानेच पश्चिम भागाला पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी अन्य अधिकारीही उपस्थित होते. (प्रतिनिधी)>पाणी विकतातप्राधिकरणाचे स्थानिक अधिकारी हे काही बिल्डरांना पाणी विकत असल्याचा आरोप या वेळी केला. तसेच पाणीचोरीचे प्रकार उघड केल्यावरही त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. रात्री १२ नंतर बिल्डरांना पाणी पुरवण्याचे काम अधिकारी करत असल्याचे पाटील यांनी पालांडे यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात पालांडे यांनी लागलीच चौकशी करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. शहरातील पाण्याचे पुन्हा नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जलवाहिनी टाकण्याचे थांबलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी योग्य ते आदेश येत्या काही दिवसांत निश्चित दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.