शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
2
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
4
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
5
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
7
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
8
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
9
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
10
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
11
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
12
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
13
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
14
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
15
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
16
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
17
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
18
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
19
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
20
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती

मनरेगातील गैरव्यवहारावर प्राधिकाऱ्याचा डोळा

By admin | Published: June 25, 2014 1:15 AM

‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही’ असे ज्या योजनेबाबत बोलले जाते त्या रोजगार हमी योजनेचे अपत्य असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातील गैरव्यवहारावर लक्ष

वर्षभरात ३२ तक्रारींवर चौकशीचंद्रशेखर बोबडे - नागपूर‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही’ असे ज्या योजनेबाबत बोलले जाते त्या रोजगार हमी योजनेचे अपत्य असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातील गैरव्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी सुरू केलेल्या तक्रार निवारण प्राधिकारी या यंत्रणेने एकाच वर्षात गैरव्यवहाराच्या ३२ प्रकरणांचा निपटारा करून दोषींवर कारवाईची शिफारस केली आहे.गरजूंना ३६५ दिवस (फक्त महाराष्ट्रात) रोजगाराची हमी देणारी ही योजना तिच्या चांगल्या गुणांच्याऐवजी त्यातील गैरव्यहारानेच अधिक गाजत आहे. प्रत्यक्षात कामे न करता कागदोपत्री कामे केल्याचे दाखवून रक्कम हडपण्याचे प्रकार या योजनेत नवीन नाही. त्यामुळेच योजनेच्या कलम १९ अन्वये प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. गैरव्यवहाराच्या तक्रारीची त्रयस्थपणे चौकशी करणाऱ्या या यंत्रणेने मे २०१३ ते मे २०१४ या काळात त्यांच्याकडे आलेल्या एकूण ६१ तक्रारींपैकी ३२ तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाईची शिफारस केली आहे. प्राधिकाऱ्याच्या शिफारशींची दखल प्रशासनाला घेणे बंधनकारक आहे हे येथे उल्लेखनीय. अलीकडच्या काळात कळमना (उमरेड) येथील लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात यंत्रणेने संबंधित दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची शिफारस केली. त्यावर प्रशासनाने अंमलबजावणी केली आहे. अशाच प्रकारच्या प्रकरणात शाखा अभियंता आणि गटविकास अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. २०१२ पासून ही यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली होती. पण ती कामापेक्षा इतर कारणांमुळेच अधिक गाजली.त्यानंतर एप्रिल २०१३ मध्ये प्रेमदास मिश्रीकोटकर यांची प्राधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर ही यंत्रणा खऱ्या कामाला लागली. तक्रारींवर चौकशी होते असा विश्वास यंत्रणेने निर्माण केल्याने येणाऱ्या तक्रारींची संख्याही वाढू लागली. मार्च ते मे २०१४ या दरम्यान तक्रारींची संख्या ही दोन आकड्यांवर गेली होती. गैरव्यवहारासंबधी वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या असो किंवा प्रत्यक्षात मजुरांनी केलेल्या तक्रारींवर सखोल चौकशी करून यंत्रणेने दोषींवर कारवाईच्या शिफारशी केल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय.